Download App

सावध करतो वेळ गेलेली नाही, अन्यथा महागात पडेल; जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

राज्य सरकारला मी सावध करतो असे म्हणत त्यांच्या हातातून अद्यापही वेळ गेलेली नसून मला किंवा समाजाला राजकारणात यायचं नाहीये.

  • Written By: Last Updated:

छ.संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली मुदत आज (दि.13) संपणार आहे. त्याआधी पुन्हा एकदा जरांगेंनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देत मराठ्यांचा रोष परवणार नाही असे म्हणत अजूनही वेळ गेलेली नसल्याचे म्हटले आहे. ते छ.संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. (Manoj Jarange On Maratha Reservation Issue)

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, आई-वडिलांवर गुन्हा दाखल

जरांगे म्हणाले की, सरकार ज्या पद्धतीने आरक्षणाबाबत हालचाली करत आहे. ते बघता मराठ्यांचा रोष सरकारल परवडणारा नाही. आरक्षणासाठी सगळे मराठे हळू हळू कामधंदे सोडून लेकरांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शिंदे समितीने नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं असे जरांगेंनी म्हटले आहे.

मला अन् माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही

राज्य सरकारला मी सावध करतो असे म्हणत त्यांच्या हातातून अद्यापही वेळ गेलेली नसून मला किंवा समाजाला राजकारणात यायचं नाहीये. तुम्ही आम्हाला त्यात ढकलण्याचं काम करू नका. तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका. नाईलाजाने राजकारात आलो तर, शंभर टक्के 288 उमेदवार पडणार असा दावाही जरांगेंनी केला.

दिल्लीत फिरली तपासाची चक्रे, दोषी आढळल्या तर थेट नारळ; पूजा खेडकर प्रकरण नव्या वळणावर

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. माता माऊलींसह सर्वजण रस्त्यावर येत असून, जातीय वाद निर्माण होऊ देऊ नका. आम्ही जातीय वादी नाही.  ओबीसी समाजाने आणि मराठा समाजाने एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊ देऊ नये असे सांगत राजकारणी लोक राजकारण करू पाहत आहेत.

सगेसोयऱ्याची अमलबजावणी घेणारच

“सरकारला दिलेली वेळ आज संपणार. शिंदे समितीने नोंदी शोधायच काम सुरु ठेवावं. विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत जायला हवं होतं. आम्ही जातीयवादी नाही. सगेसोयऱ्याची अमलबजावणी घेणारच” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us