Download App

Mumbai Rain : पहिल्याच पावसात ‘मंत्रालय’ सामसूम, 70 टक्के अधिकारी वर्गाची दांडी

  • Written By: Last Updated:

प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी )

Mantalaya 70 Persent Employee Absent Due To Heavy Rain In Mumbai :  मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका राज्याची राजधानी मुंबईला (Mumbai Rain) बसला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकीकडे येथील जीवन विस्कळीत झालेले असतानाच याचा फटका राज्याचा बोजा हाकणाऱ्या मंत्रालयालादेखील (Mantralay)बसला आहे. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मंत्रालयात केवळ 30 टक्के कर्मचारीच उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धुवाँघार कोसळणाऱ्या पावासाच्या सरींनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला अनुपस्थितीचे ग्रहण लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानक, मंत्रालयात पाणीच पाणी…पाहा PHOTO

पावसाचा इशारा अन् उर्वरित कर्मचारीही घराकडे रवाना 

सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. त्यात हवामान खात्याने येत्या तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंत्रालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दुपारी साडेतीन वाजताच घरी जाण्यास सांगण्यात आले. यामुळे इतरवेळी गजबजलेलं मंत्रालय सामसुम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.00

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशन तुंबलं, मेट्रो प्रशासनाची मुजोरी अन् रिपोर्टिंगला मज्जाव

पावसाचा मध्य रेल्वेला फटका

राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसाने सोमवारी सकाळी मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत करून टाकली. रस्त्यावर विविध ठिकाणी पाणी साचले होते तर मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही त्याचा फटका बसला. मध्य रेल्वे वर वाहतूक विस्कळीत झाल्याने एक ते दोन तास उशिरा गाड्या धावत होत्या त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांना दमछाक करावी लागत होती. सकाळी निघालेले कर्मचारी दुपारी बारा- एक वाजेपर्यंत कसेबसे कार्यालयात पोहोचले.

Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने झोडपले; १३५ मिमी. पावसाची नोंद, १०७ वर्षांचा विक्रम मोडला

मंत्रालयात 30 टक्के उपस्थिती

पावसाचा फटका बसल्याने मंत्रालयाची उपस्थिती अत्यंत कमी होती. मंत्रालयातील 7678 कर्मचाऱ्यांपैकी बायोमेट्रिक वर केवळ 2649 म्हणजे 30% कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली गेली होती. यामध्ये सर्वाधिक उपस्थिती जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांची 49% होती तर सर्वात कमी उपस्थिती गृहनिर्माण विभागातील कर्मचाऱ्यांची 10% इतकी होती. याशिवाय वित्त विभाग 31 टक्के कृषी विभाग 23 टक्के उच्च आणि तंत्रशिक्षण 31 टक्के गृह विभाग 33% राजे शिष्टाचार 27% वैद्यकीय शिक्षण 25% मराठी भाषा विभाग 22 टक्के सार्वजनिक बांधकाम विभाग 39 टक्के नगर विकास विभाग 26 टक्के आणि स्वयंरोजगार विभागाचे 29 टक्के उपस्थिती नोंदवली गेली होती.

follow us