Dcm Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदत देण्याची मागणी होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वच मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज सर्वच मंत्र्यांचे पायं शेतकऱ्यांच्या बांधाकडे वळले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी आज सोलापुरातील संगोबा गावातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवार माध्यमांशी संवाद साधत असतानाच एका नुकसानग्रस्त शेतकरी महिलेने अहो, दादा आमच्या बांधावर या, अशी आर्त हाक दिली. त्यावर तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचा शब्दच अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी आज सोलापुरातील सीना नदीकाठच्या गावांची पाहणी केली. यावेळी अजित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच गेल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, 14 सप्टेंबरनंतरच्या नुकसानीचे पंचनामे आल्यावर मदत मिळणार आहे. आम्ही लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत आम्ही माहिती घेऊन मदत देणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
“स्पंदनं” जागवणारा स्व-बळाचा ‘विजय’ वीणा जामकरची “कुर्ला टू वेंगुर्ला” च्या दिग्दर्शकासाठी खास पोस्ट
याचदरम्यान, ज्या ठिकाणाहून अजित पवार माध्यमांशी बोलत होते, त्यामागेच काही शेतकरी अजित पवार यांची वाट पाहत होते. मात्र, कोणतंही वाहन नसल्याने अजित पवार यांना तिथल्या शेतकऱ्यांच्या जवळ जाता आलं नाही. ट्रॅक्टर असता तर मी तुमच्याकडे आलो असतो असंही याबाबत अजित पवार यांनी सांगितलं. याचवेळी एका महिलेने अजितदादांना हाक दिली, त्यावर अजित पवार म्हणाले, तुमचं जे काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई आम्ही देणार आहोत, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी
दरम्यान, अजित पवार यांनी संगोबा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून, शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालं आहे, याबद्दलची माहिती घेतली आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह जमीनीही वाहून गेल्याचं चित्र अजितदादांना पाहायला मिळालंय. या पूरग्रस्त भागात बचावकार्याने दखल घेत नागरिकांचे जीव वाचवले आहेत. त्याबद्दल बचावकार्य करणाऱ्यांचे अजितदादांनी कौतूक केले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये मंजूर…
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 2215 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं. पुढील 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ओला दुष्काळच कायय तर ज्या ठिकाी नुकसान झालंय त्या ठिकाणी पाहिजे ती मदत देणार असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीयं.