Download App

शेततळे ठरताहेत धोकादायक; उपाययोजनांसाठी आमदार तांबेंचे तीन मंत्र्यांना पत्र

शेततळ्यात बुडून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने उपाययोजनांसाठी आ. सत्यजित तांबेंचे कृषि, शिक्षण, ग्रामविकास मंत्र्यांना पत्र

Satyajeet Tambe : राज्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत. हे शेततळे अनेक बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. लहान मुलंच नव्हे तर सराईत पोहणारी मोठी माणसंही शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडत आहेत. या समस्येवर उपाययोजना आणि जनजागृती करावी अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषिमंत्री धनंजय मुंडे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. यासाठी आमदार तांबे यांनी या तिन्ही मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

शेततळ्यांचे काठ निसरडे असतात तसेच अनेकदा शेततळ्यात गाळ साचलेला असतो. त्यामुळे शेततळ्यात लहान मुलेच काय, अगदी पोहणारे देखील बुडण्याची शक्यता असते. यासाठी शेततळ्याची रचना, त्यापासून असणारे धोके विद्यार्थ्यांना सांगावे. शेततळ्यात पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती बुडताना आढळल्यास काय करावे याची माहिती विद्यार्थ्यांना असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी आ. तांबेंनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केलेली आहे.

‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’ चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट

शेततळ्यास कुंपण घालावे, लहान मुलांना प्रवेश करता येणार नाही अशी व्यवस्था करावी. शेततळ्याच्या चारही बाजूला धोक्याची सूचना देणारा फलक लावावा. जेणेकरून मनुष्य अथवा जनावर शेततळ्यात उतरू नये, अशी मागणी आ. तांबेंनी कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे केली. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे शेततळ्यास कुंपण घालणे, टायर ट्यूब, ड्रम अशा वस्तू पाण्यात सोडणे, पायऱ्या तयार करणे, दोरखंड सोडणे अशा वस्तूंच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

शेततळ्याची रचना, त्यापासून असणारे धोके लक्षात घेणे. शेततळ्यात पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. एखादी व्यक्ती बुडताना आढळल्यास काय करावे याची माहिती नागरिकांना देणे. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेततळ्यापासून असलेल्या धोक्याबाबत समाजात गांभीर्य निर्माण करणे हे देखील आवश्यक आहे. या उपाययोजनांमुळे होणाऱ्या दुर्घटना टळू शकतात,असे आमदार सत्यजीत तांबे यांनी या पत्रात म्हटले आहे.

पेपरफुटी प्रकरणी सत्यजित तांबेंनी लक्ष वेधलं; शासनाकडे केली ‘ही’ मागणी

follow us

वेब स्टोरीज