अहिल्यानगर : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येवून सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. हे सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. सरकारच्या कारभाराबाबत जनतेमध्ये निराशा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदान उतरणार असून याबाबतचा निर्णय आज अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घेण्यात आला. अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगहावर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. (Sambhaji Brigade)
कर्जाच्या नावाखाली सुरू असलेला गोरखधंदा होणार बंद; सरकारचा ‘तो’ कायदा अंतिम टप्प्यात
निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिले आदेश
यावेळी बोलताना पक्षाचे संघटक डॉ. बालाजी जाधव म्हणाले की, राज्यात सरकार येवून जवळपास सहा महिने उलटले. परंतु, अद्यापही शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी आंदीचे प्रश्न जैसे थे आहेत. जर सरकारला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांना टाळ्यावर आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेत असून संभाजी बिग्रेड 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक आंदोलने करुन अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लढविण्याचा कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यासंदर्भात चर्चा झाली असून आगामी निवडणुका लढण्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहे. तसेच निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देखील देण्यात आले.
खोटा इतिहास समाजात रुजवण्याचा प्रयत्न
यावेळी अतुल गायकवाड यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून काही अपप्रवृत्ती खोटा इतिहास समाजात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना देखील संभाजी ब्रिगेडने संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देत खरा इतिहास हा बहुजन समाजाच्या समोर आणला आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी संभाजी ब्रिगेडने वारंवार मागणी केली आहे. मात्र, नाकर्ते सरकार भाव देण्यासाठी अनुकूल नसल्याने आता राजकीय पटलावर संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणे यासाठी संभाजी ब्रिगेडने काम करत आहे. संभाजी ब्रिगेड आता राजकारणाच्या मैदानात उतरल्याने अनेकांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर सर्व कक्षांची जिल्हयात बांधणी केली तर राजकिय सत्ता दुर नाही, असं ते म्हणाले.
आम्हाला मालक बनता येणार नाही, आमदार लोणीकरांना समज देणार; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे काम अतिशय चांगले असून भविष्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केले जाणार आहे. जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी गाव गाव पिंजून काढले असून जिल्हयात 350 च्या वर शाखा कार्यरत असल्याने इतर कक्षांची देखील बांधणी होणे गरजचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड सक्षम असून इतर कक्षांची देखील लवकरच बांधणी पुर्ण करणार आहे. जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या शाखा गाव तेथे करण्याचा राजेश परकाळे यांचा मानस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या.
तर परकाळे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बहुजन समाजातील जनतेला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. संभाजी ब्रिगेडची बांधणी करताना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत आज जवळपास 360 शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. परंतु यावर आपण थांबणार नसून गाव तेथे शाखा असा आपला पुढील अजंठा आहे. येणार्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवणारच असा मानस त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत अनेकांचे पक्षात प्रवेश
या बैठकीत आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या अँड दामिनी नगरे, सतीश नाना श्रीराम, प्रफुल्ल (बापू) जगताप, सौरभ शितोळे, पांडुरंग अंकुश खोरे, संदीप शिवाजी गोरे, कय्युम हैदर शेख, सुरजित गायकवाड, शुभम सांगळे, कृष्णा जगताप, आयुब शेख, संगीता बाबासाहेब शिंदे, जयश्री रोहकले, संपत जाधव, ॲड. सोमनाथ गोपाळे, संतोष भिसे, रामकृष्ण पवार, नितीन शेलार, सज्जन पोकळे, रमजान शेख, सुशेन कदम, नागेश खेडकर, अमोल आरडे, अनिकेत शिंदे, वैभव काळदाते आदींनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला.
या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटना बांधणी करण्यात आली. या बैठकीत निरिक्षक कमिटीचे सदस्य व प्रदेश संघटक डॉ बालाजी जाधव, अतुल गायकवाड, रमेश गायकवाड, राज्याचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.सुरेश इथापे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.