Download App

जयंत पाटील भाजपात जाणार? खासदार निलेश लंकेंनी एकाच वाक्यात सांगितलं…

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चेवर खासदार निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडलीयं.

Nilesh Lanke : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची इनकमिंग होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याही नावाची आवर्जून चर्चा होत असते. जयंत पाटील भाजपात जाणार आहेत का? ते कोणता वेगळा निर्णय घेणार आहेत का? असा थेट सवाल खासदार निलेश लंके यांना माध्यमांकडून करण्यात आला. यावेळी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एकाच वाक्यात विषय सांगून क्लिअर केलायं. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून शरद पवारांचा परिवार आहे, या परिवारात कोणतेही मतभेद नसल्याचं निलेश लंकेंनी सांगितलंय.

बडगुजरांच्या गुडघ्याला बाशिंग; हजारो कार्यकर्यांसह निघाले मुंबईला, बावनकुळेंनी मात्र बॉम्ब फोडला

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मागील आठ वर्षांपासून आहेत. त्यांची कामगिरी अतिशय चांगली आणि समाधानकारक राहिलेली आहे. जयंत पाटील यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पण ते कोणताही निर्णय घेणार नाहीत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर शरद पवारांचा परिवार असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

Video : छातीवर पिस्तुल ठेवून म्हणाली, इतक्या गोळ्या घालीन की… तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

यावेळी पुढे बोलताना माध्यमांकडून निलेश लंके यांना प्रतिसवालही करण्यात आला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. शरद पवार यांनीही याबाबत एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? असा सवाल करण्यात आल्यानंतर त्यावर लंके म्हणाले, राज्याच्या राजकीय घडमोडींबाबत निर्णय घेण्याचा अधिकार खुद्द शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. मा या परिवारातील एक छोटा घटक असून छोट्या घटकाने यावर चर्चा करायची नसते, तेच पाळणारा मी एक छोटा कार्यकर्ता असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलंय.

काय सांगता! गुगल देणार AI चे धडे तेही मोफत; घरबसल्या करता येणारे कोर्स होणार सुरू

कागदोपत्री गुंतवणूक आणून दाखवा – लंकेंचं विखेंना चॅलेंज
पारनेरमधील सुपा एमआयडीसीबाबत दहशत दादागिरीची भाषा बोलली जात होती., पण सुपा एमआयडीसी चांगल्या पद्धतीने विकसित झाली असून या एमआयडीसीला आम्ही संरक्षण दिलं आहे. मी एका हंगे गावचा सरपंच असताना एक कंपनी होती. त्यावेळी मी उद्योजकांना संरक्षण दिलं म्हणूनच आज एवढ्या कंपन्या सुपा एमआयडीसीमध्ये आहेत. शिर्डीला जी गुंतवणूक आली त्यावर मला आनंदच आहे. माझ्या जिल्ह्यात गुंतवणूक आलीयं याचा मला आनंदच पण ती गुंतवणूक ऑन रेकॉर्ड पाहिजे, पत्रकार परिषदत सांगितलं म्हणून आली असं नाही कागदावर आणली पाहिजे. कागदावर गुंतवणूक आल्याचं मी स्वागतच करतो, यात मी मला तथ्य वाटत नाही, असं निलेश लंके म्हणाले आहेत.

follow us