Download App

मतपेट्या उघडतील तेव्हा ना पंतप्रधान बदलणार, ना अहिल्यानगरचा खासदार; खा. विखेंना विश्वास

Sujay Vikhe यांनी मतदारांना पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं.

Sujay Vikhe expressed believe about PM Modi and his victory : लोकसभेच्या निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिणचे महायुती आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांनी अहमदनगर शहरात विराट सभा घेतली. या सभेत बोलताना सुजय विखे यांनी मतदारांना पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच 4 जूनला मतपेट्या उघडतील तेव्हा पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान होतील तसेच आपण पुन्हा खासदार होऊ असा विश्वास व्यक्त केला.

देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप

यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की, या सभेतील प्रचंड अशा गर्दीने हे सिद्ध केले आहे की 4 जूनला ज्यावेळी मत पेट्या उघडतील. तेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार. यावेळी सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोनदा उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी सभा आहे. तर मोदी जेव्हा सभा घेतात तेव्हा तेथील उमेदवार विजयी होतोच. असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं

तसेच ते म्हणाले की, नगर मधील मोदींची ही तिसरी सभा आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत आणि माझा अनुक्रम क्रमांक देखील तीनच आहे. हा खास योग जुळून आला आहे. सध्या राजकारणामध्ये केवळ आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विकासाचा मुद्दाच मांडला जात नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना गोरगरीब आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

कुलगाममध्ये चकमक! दोन दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सैन्यदलाचं मोठं यश

त्यामुळे 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी जेव्हा मत पेट्या उघडतील. तेव्हा ना या देशाचे पंतप्रधान बदलणार आणि ना या अहिल्यानगरचा खासदार बदणार. असा देखील विश्वास अहमदनगर दक्षिणचे महायुती आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी व्यक्त केला.

follow us