Download App

बीड जिल्हा ओबीसींसाठी राखीव दिला का?, मंत्रिपदाला डावलल्याने प्रकाश सोळंकेंची उघड नाराजी व्यक्त

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी आता मंत्रिपदावरून डावललं जात असल्याने नाराजी बोलून दाखवली.

  • Written By: Last Updated:

Prakash Solanke : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. (Solanke) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंडेंना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही हे दुर्दैव आहे. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम पक्षाने मागच्या काही वर्षांमध्ये केलं आहे. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का? असा सवालही सोळंके यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

..त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो; धनंजय मुंडे वंजारी मेळाव्यात बोलताना झाले भावूक

बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीत केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही असंही थेट भाष्य प्रकाश सोळंके यांनी केलं आहे.

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते असं मला वाटतं. मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती असंही सोळंके यांनी म्हटलं आहे. तसंच, आमदार धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करावं, किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्या, त्यांना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत असंही सोळंके यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. अजित पवार म्हणाले की, मंगळवारी मुंबईत पक्षातील आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी सोळंके यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यावेळी त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण जाणून घेणार आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि प्रकाश सोळंके यांच्यात नेमकं काय बोलणं होणार आणि त्याचे परिणाम काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

follow us