Download App

हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा…, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार?

Pratap Sarnaik Statement Hindi  Mumbais Spoken Language : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदी मराठी (Hindi Marathi Dispute) वाद सुरू आहे. दरम्यान अशातच आता राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असंच प्रताप सरनाईकांनी (Pratap Sarnaik) केलं आहे. राजकीय वर्तुळात सरनाईक यांच्या या विधानाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

मीरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेसोबत जेव्हा भोलतो, तेव्ही पूर्ण मराठीतच बोलतो. परंतु जेव्हा मीरा भाईंदरमध्ये एन्ट्री करतो, तेव्हा आपोआप तोंडातून हिंदीच बाहेर पडते. आजकाल आपण म्हणतोय की, मराठी माझी (Maharashtra Politics) मातृभूमी आहे. आमची माय आहे. परंतु हिंदी आपली लाडकी बहिण आहे. लाडक्या बहिणींमुळं आम्ही आज 237 च्याही पुढे गेलो आहे. असं देखील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.

वैष्णवीच्या मृत्यूआधी निलेश चव्हाण कुणाशी बोलला? सरकारी वकिलांनी कोर्टात नेमकं काय सांगितलं..

ठीक आहे. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. परंतु इतकी प्युअर हिंदी सुद्धा बोलली जात नाहीये. अनेकदा हिंदी बोलत असताना त्यात एक-दोन इंग्रजी शब्द येतात, असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी आपली लाडकी बहिण आहे. लाडक्या बहिणींमुळं आम्ही आज 237 च्याही पुढे गेलो, असंही त्यांनी म्हटलंय. राजकीय वर्तुळात मात्र यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणचा 3 जूनपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम, न्यायालयाचे आदेश

प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय लावला, हे बघावं लागेल. मराठी मायबोली असून आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मराठीमध्येच बोलतो. प्रताप सरनाईक स्वतः मराठी भाषिक असून त्यांच्या मतदारसंघामध्ये मराठीचाच वापर करतात. तर मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषिक नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी हिंदीत संवाद साधला असावा, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

 

follow us