वैष्णवीच्या मृत्यूआधी निलेश चव्हाण कुणाशी बोलला? सरकारी वकिलांनी कोर्टात नेमकं काय सांगितलं..

Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणात आज न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत (Nilesh Chavan) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आज सकाळीच त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत सरकार वकिलांनी अनेक महत्वाचे युक्तिवाद केले. त्यानंतर निलेश चव्हाणची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
वैष्णवीच्या मृत्यूआधी आरोपींमधील एकासोबत त्याचे फोनवर बोलणे झाल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात काय सहभाग आहे. मोबाइल डेटा, कॉल डिटेल्स तपासायचे आहेत. वैष्णवी हगवणे यांना करिश्मासोबत मिळून निलेश चव्हाणने काय त्रास दिला याचाही तपास करायचा आहे. करिश्मा आणि शशांक दोघांचेही मोबाइल याच्याकडेच आहेत. त्याच्याकडून ते जप्त करायचे आहेत म्हणून कस्टडी हवी आहे, असे वकिलांनी सांगितले.
यावर चव्हाणच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. व्यक्ती पकडायचा आणि मग त्याच्या विरोधात पुरावे गोळा करायचे असा प्रकार सुरू आहे. सर्व कलमे जामीनपात्र आहेत. पोलीस कोठडी देऊ नये असे म्हणणे त्यांनी मांडले. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निलेश चव्हाणला येत्या 3 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणचा 3 जूनपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम, न्यायालयाचे आदेश
निलेश चव्हाण असा झााला गजाआड
पोलिसांना तपासात माहिती मिळाली की, निलेश चव्हाण 25 मे रोजी दिल्लीहून गोरखपूर दरम्यान खासगी बसने गेला होता. त्याचं लोकेशन सुद्धा पोलीस तपासात ट्रेस झालं होतं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यात्री खात्री सुद्धा (Pune Crime) झाली. परंतु गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर निलेश नेमका कुठे गेला? याचा काही तपास लागत नव्हता. त्यानंतर पुन्हा शेकडो सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानंतर तो नेपाळला गेल्याचं स्पष्ट झालं.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 30 मे रोजी भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथे निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. पुणे पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर होती. मधल्या काळात निलेश चव्हाणचा पुणे, मुंबई, कोकण, कर्नाटक, गोवा या राज्यांत देखील शोध घेतला जात होता. त्याच्या संपर्कातील अनेक मित्र आणि नातेवाइकांची चौकशी केली होती. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले अन् पोलीस नीलेश चव्हाणपर्यंत पोहोचण्यात यशस्वी देखील ठरले.
प्रकरण काय?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. यानंतर वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, असे आरोप करण्यात आले होते. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्यानंतरही आणखी पैशांसाठी वैष्णवीचा छळ सुरु होता असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे.
मोठी बातमी! पाकिस्तानने अख्खं शहरच गमावलं; ‘या’ शहराचा बलूच आर्मीने घेतला कब्जा