Download App

Rain Alert : चार दिवस मुसळधार! राज्यातील ‘या’ 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. आज शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले तर शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढतील. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

राज्यात आजपासून 25 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम यवतमाळ तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी पाऊस होत आहे. या काळात सहसा पाऊस होत नाही. मात्र आता पाऊस होत असल्याने आणि आणखी काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या काळात अनेक ठिकाणी पिके काढणीची कामे सुरू आहेत. तसेच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचीही तयारी केली आहे. आणि नेमक्या याच वेळी पावसाची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, 5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Tags

follow us