Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज बुधवार पहाटेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. या दिवसात पाऊस होत नाही. पीके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.

येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यां पुढील दोन दिवस हलका पाऊस होईल अशी शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल असा अंदाज आहे. तर बाकी जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहिल त्यामुळे थंडी कमी होईल.

Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update : येत्या 48 तासांत या भागांमध्ये बरसणार परतीचा पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube