MNS Rally Againts Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा मोर्चा 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.
FASTag होणार सुपर टॅग! चार्जिंगपासून पार्किंगपर्यंत सगळंच करणार फास्टॅग; वाचा सरकारचं प्लॅनिंग
राज ठाकरेंची पोस्ट काय?
मोर्चाच्या तारखेत बदल होण्याबाबत स्वतः राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी. (MNS Rally Againts Hindi Language)
राजकीय खलबतांनंतर तारखेत बदल?
एकीकडे आज (दि.26) सकाळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्य काही तासातच या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मोर्चाची तारीख फक्त बदलण्यात आली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ तीच असल्याचे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु, राजकीय खलबतांनंतर राज ठाकरेंनी यू-टर्न घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, ठाकरेंचंही बरोबरच”; शरद पवार रोखठोक बोलले
पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते राज ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच सरकारच्या हिंदी बाबतची भूमिका मान्य नसल्याचाही उल्लेख केला होता. मोर्चाबाबत सर्व राजकीय पक्षांनी पालकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.
हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची नको; ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे याचं स्पष्ट मत
मोर्चात कोणताही झेंडा नसेल, मराठी हा एक अजेंडा असेल
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी सांगितले की, हिंदी लादण्याचा केंद्रातील अधिकाऱ्यांचा अजेंडा असून, हा अजेंडा कोणत्याही परिस्थितीत लादू देणार नसून, हिंदी सक्ती होऊ देणार नाही. हिंदी सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात कोणताही झेंडा नसेल असे सांगत यात केवळ मराठी हा एक अजेंडा असेल असेही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
कोण कोण सहभागी होत ते बघणार
हिंदी सक्ती विरोधात काढण्या येणाऱ्या मोर्च्यात कोण कोण नेते सहभागी होतात आणि कोण सामीन होत नाही ते मला बघायचं आहे. यावेळी दादा भुसेंसोबत काय चर्चा झाली याबाबत विचारले असता ते म्हणाले की. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दादा भुसे यांच्याकडे नव्हती. त्यामुळे सरकारचे सर्व दाखले फेटाळून लावल्याचे राज ठाकरे म्हणाले.
चौथीपर्यंत हिंदी नको कोणत्याही भाषेला..;, अजितदादांनीच दिला घरचा आहेर; हिंदी सक्तीवर थेट वक्तव्य
सरकारला महाराष्ट्राची ताकद दिसेल
मोर्चासाठी 6 जुलैची तारीख का काढली याचाही खुलासा राज ठाकरेंनी यावेळी केला होता. मोर्चासाठी मुद्दाम 6 जुलैचा दिवस निवडण्यात आला आहे. या दिवशी रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना येणे शक्य होईल असे सांगत या दिवशी सरकारला महाराष्ट्राची ताकद दिसेल असे ठाकरे म्हणाले होते. पण आता मनसेकडून मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. अवघ्या काही तासातच तारखेत बदल करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांविरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल करण्यासाठी सरकारचेच मत विचारात घेतले की काय? अशा एक न अनेक चर्चांनी जोर धरला आहे.
भाषेच्या बंधनामागचं लॉजिक काय?
कोणत्याही भांडणापेक्षा मराठी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. विठ्ठलाला साकडं घालतो सरकारला सू बुद्धी दे. भाषा सोडून दुसरी कोणती गोष्ट आहे त्याला आमचा पाठिंबा असेल. पण, भाषेच बंधन का यामागे लॉजिक काय? शिक्षकांना पगार द्यायला पैसे आहे का? कांत्राटदार पैशासाठी बोंबलत आहे असे सांगत एखादी मोठी गोष्ट लपवण्यासाठी विषय डायवर्ट करण्यासाठी हिंदी सक्तीचा घाट घातला जातोय का? अशी शंका उपस्थित असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.