Download App

टेन्शन वाढलं! अहिल्यानगर जिल्ह्यात बांग्लादेशींसह रोहिंग्याची घुसखोरी, शिवसेनेचे थेट पोलीस अधीक्षकांना पत्र

Rohingya Bangladeshis in Ahilyanagar district Shiv Sena to Police : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) आणि जिल्ह्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा धोका आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, यासाठी आता ठाकरेंची शिवसेना ( Thackeray Shiv Sena) आक्रमक झाली आहे. याबाबत शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना पत्र दिले आहे. दरम्यान शहर अन् जिल्ह्यात असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची (Rohingya Bangladeshis in Ahilyanagar) शोध मोहीम सुरू आहे. याबाबत नुकतीच पोलीस प्रशासनाची एक बैठक झाली आहे. याबाबत कार्यवाहीच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज दिली आहे.

शिवसेनेनं पत्रात काय म्हटलंय?

शिवसेनेने दिलेल्या पत्रात म्हटलंय की सध्या अहमदनगर शहरातील कापड बाजार, मोची गल्ली, घास गल्ली, आशा टॉकीज चौक, पंचवीस चावडी, कोठला स्टँड, एसटी स्टँड, मुकुंद नगर येथे कारागीर, कामगार, वेटर, सेल्समन, बांधकाम क्षेत्रातील कामगार, विक्रेते म्हणून बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. जो शहराच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा (Ahilyanagar News) धोका आहे. नगर-मनमाड रोडवरील बाजारपेठ, मुख्य चौक, मॉल परिसर, वसाहती या भागात बांग्लादेशी घुसखोरांचा वाढता वावर स्पष्टपणे दिसून येत आहे. हे घुसखोर ‘बांगड्या विकणे’, ‘मेहंदी लावणे’, ‘टॅटू गोंदवणे’, ‘दागिन्यांची कारागिरी’ या नावाखाली परधर्मीय महिला अन् युवतींशी लगट करण्याचा प्रयत्न करतात.

भाच्याने भाजप प्रवेशाचे पत्ते झाकले, मामांचाही सस्पेन्स कायम; प्राजक्त तनपुरेंचा सूचक इशारा काय?

मेहंदी लावणे, बांगड्या भरणे, शिवणकाम या कारणांनी महिलांच्या हातांना त्यांचा स्पर्श होतो. तेव्हा संपर्कात आलेल्या महिला वर्गाशी ते जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. कटाक्ष टाकतात आणि अनेकदा अश्लील वर्तनही करतात. याशिवाय, पार्किंग अथवा किरकोळ कारणांवरून भांडण झाल्यास ते सरळ मारहाण, शिवीगाळ करतात. अधिक विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत ओळखपत्रे नसतात. काहीजणांकडे बनावट आधारकार्ड अन् बोगस रेशनकार्ड देखील असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींची नावे मतदार यादीत आढळली आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे.

‘किती विकेट गेल्या’ यापेक्षा जिंकलेला डाव महत्त्वाचा; पुण्यात CDS अनिल चौहान यांचं महत्त्वाचं विधान

हे व्यक्ती बिहारी, बंगाली किंवा यूपी राज्यातील असल्याचे भासवतात. गेल्या पंधरा वर्षापासून आपण नगरमध्येच राहत असल्याचे खोटे सांगतात. मात्र, हे स्पष्टपणे बांगलादेशी घुसखोर आहेत. काही वर्षांपासून त्यांचा हॉटेल व्यवसायात वेटर/कुक म्हणून वावर असल्याचेही आढळले आहे. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान निर्माण करणारी असून याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. आपणास नम्र विनंती आहे की, याविषयी सखोल तपास करून, या अनधिकृत घुसखोरांना ओळखून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. त्यांच्याकडील आधार कार्ड जन्म दाखले आणि इतर कागदपत्रे तपासून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिली ग्वाही

शहर आणि जिल्ह्यात बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत माहिती संकलित केली जात आहे. दहशतवाद विरोध पथक, तसेच इतर स्थानिक यंत्रणेशी यासंदर्भात चर्चा झालेली आहे. काही जुनी आणि काही नवीन माहितीच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहिम सुरू आहे, याबाबत लवकरत रिझल्ट दिसतील, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

 

follow us