Download App

माझ्या संपादकीयाची चर्चा होते तर पुस्तकाची का नाही होणार? ‘नरकातला स्वर्ग’चं प्रकाशन, राऊतांची फटकेबाजी

मी लिहलंय ते सत्य लिहलं असा दावा करत संजय राऊतांनी भाजप अन् शिंदे सेनेवर जोरदार प्रहार केला. ते त्यांचं नरकातला स्वर्ग या

Sanjay Raut Book Publication : मी संपादकीय लिहतो त्याची राज्यभर चर्चा होते तर मी पुस्तक लिहल्यावर ती व्हायलाच पाहिजे. गेली चार-पाच दिवसांपासून अनेकांना मिर्च्या लागल्यात. (Raut) हे लिहलं ते लिहलं अश्या आशयाने जोरदार चर्चा सुरू आहे. का होणार नाही व्हायलाच पाहिजे कारण मी लिहलंय ते सत्य लिहलं असा दावा करत संजय राऊतांनी भाजप अन् शिंदे सेनेवर जोरदार प्रहार केला. ते त्यांचं नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रसिद्ध गितकार जावेद अख्तर, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

आम्ही राजकीय लोक आहोत. त्रास होणारच. काही लोकांनी शेपूट घातलं पण आम्ही गांडू नाहीत. आम्ही सामोरं गोलो. आज काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केला आहे. मात्र, आजपासून महाराष्ट्राचा स्वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशा शब्दांत राऊतांनी यावेळी तोफ डागली. त्याचबरोबर तुरुंगात असताना अनिल देशमुखांनी उंदरांना नाव काय ठेवली यावर बोलताना आता ते बोलण बरोबर नाही असं म्हणते ते राज्याचे मुख्यमंत्री आहे असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.

Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत नरकातला स्वर्ग  का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत

एकदा तुरुंगात उभे होतो. तेव्हा पाहिलं. म्हटलं ससे कुठून आले. कुंदन शिंदे म्हणाले, साहेब उंदीर नाही. ससा आहे. सश्यासारखे उंदीर आणि धिप्पाड आहे. देशमुखांनी त्यांना नावे ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं योग्य नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मर्यादा पाळल्या पाहिजे. त्यातून पुस्तक आलं. दर दिवशी माझं एडिट रोज बाहेर यायचं. सरकारने चौकशी लावली. माझं रोखठोक येत होतं. मी खूश होतो. कारण माझं काम होत होतं. आतल्या गोष्टी आतच बऱ्या. या कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस खचत नाही. कारण आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी तीच शिकवण दिली खचू नका.

मी कोठडीत होतो. आणि सरकारवर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. संजय राऊत तुरुंगात आहेत. पण रोखठोक प्रसिद्ध कसं झाले. दोन अधिकारी आले. त्यांनी रात्री उठवलं. चौकशी सुरू केली. मी राज्यपालांवर लिहिलं होतं. म्हटलं मी आधीच लिहून आलो होतो. म्हटलं मला माहीत होतं ते घाण करणार आहेत. मी म्हटलं तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे. तुम्ही चेक करा. साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढले होते. तो साबरमतीच्या तुरुंगात सात महिने होता. त्याला विमानतळावरून उचललं. आमचा अनुभव तुरुंगातला कमी आहे. तो मला ज्येष्ठ आहे. ८० टक्के पुस्तक तुरुंगात लिहिलं. २० टक्के लिहायला दोन वर्ष झाली.

आम्ही कसाबच्या बॅरकमध्ये राहिलो. ती बॅरक जयंत पाटलांनी केली होती. त्याची डिझाईन त्यांनी बनवली. आणि नंतर आम्हाला आत पाठवलं. नंतर जयंत पाटील म्हणाले, कसा होता बॅरक. मीच बनवला आहे. कटू आठवणी असतातच. त्या कटू म्हणून घ्यायच्या नाही. तो अनुभव म्हणून घ्यायचा. मी उद्धव ठाकरेंना म्हटलं कसं आहे पुस्तक. म्हणाले, मी भाषणात सांगतो. ते म्हणाले, एका वाक्यात सांगतो पुस्तकात रडगाण नाही. तसंच, मला अटक केली त्याला पश्चाताप झाला. साला झक मारली आणि याला पकडलं. आम्ही गुंडे आहोत. आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही. देशाला अशाच लोकांची गरज आहे. लोहा लोह्याला कापतो.

 

 

 

 

follow us