Download App

Ahmedabad Plane Crash : सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं?; राऊतांच्या शंकेने खळबळ

Sanjay Raut यांनी अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) झालेल्या विमान अपघातावर उपस्थित केलेल्या शंकेने खळबळ माजली आहे.

Sanjay Raut doubts Engine shut down through cyber attack after Ahmedabad Plane Crash : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 275 लोकांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातनंतर आता विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या शंकेने खळबळ माजली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) झालेल्या विमान अपघातावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आता ड्रीमलाइनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. लोकांच्या मनात ज्या शंका आहेत. त्यासाठी देश-विदेशातल्या अनेक एजन्सी तपास करत आहेत. त्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. पण ड्रीमलाइनरचं डील झालं होतं. तेव्हा भाजपाने शंका उपस्थित केल्या होत्या. कारण युपीएच्या काळात या खरेदी झाल्या होत्या. आता हा अपघात झाल्यावर तपास सुरू आहे. मुळात अपघात झाला कसा? हे घडलं कसं? हे सिविल एविएशन एजन्सीला पडलेलं कोडं आहे.

मोठी बातमी! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ

त्याचबरोबर एकाच वेळेला दोन इंजिनं बंद पडली कशी? सायबरच्या माध्यमातून कोणी हाय जॉक केले होते का? शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणाचं ठप्प केली जाते, मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते, याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणं गरजेचे नाही. शंका आहेत. पण शंका व्यक्त करून गोंधळ निर्माण करणं योग्य नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी शंका उपस्थित केल्याने खळबळ माजली आहे.

Air India Plane Crash : ‘सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा सवाल…

पुढे राऊत म्हणाले की, एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा माणसं कमी आहेत. ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे तेथे माणसं कमी आहेत. अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहेत? या एअरपोर्टवर विमानाच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे? या सगळ्या गोष्टींवर आज प्रवासी यांच्या मनात संशय आहे. हा संशय असाच राहील.

Ahmedabad plane crash मधील मृतांचा आकडा वाढला; मेडीकल कॉलेजमधील 34 जणांचा मृत्यू

दुसरकीडे मंत्री मृत्यूच्या ढिगाऱ्यावर उभे राहून ज्या पद्धतीने वागत होते. रील बनवत होते. यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हतं. जे मृत्यू पावले त्यांचे दुःख आम्हाला आहे. पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे असं दिसत नाही. अहमदाबाद एअरपोर्ट हे केंद्र आहे. तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळतो? ती कोण लोक आहेत? अहमदाबादलाच हा अपघात का झाला? हे खूप प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मेडिकल इमारतीवर विमान कोसळलं. आसपासचे लोक देखील मरण पावले. हे सहज विसरता येणार नाही.

कोरोना, वारकरी निधी ते विमान अपघात; अजितदादांनी एक-एक मुद्दा क्लिअर केला

पहलगाममध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचं पद्धतीचा हा अपघात आहे. यातून सरकार काय धडा घेणार आहे? हवाई क्षेत्रात सर्वात जास्त सतर्कता असली पाहिजे. एअर इंडियाचं खाजगीकरण करून जबाबदाऱ्या झटकता येणार नाही. रतन टाटा यांच्या निधनाने टाटा समूहाला एअर इंडिया समूहाला गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विमानांची दुरुस्ती, विमानांमधील सेवा या अनेक प्रश्नांवर चर्चा प्रश्नचिन्ह आहे.एव्हिएशन इंडस्ट्री मध्ये घटनांपेक्षा व्यवहारांवर याच्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य आहे. या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगपतींची स्पर्धा सुरू आहे. या क्षेत्रावर सत्ता मिळविण्याचा अजून घाणेरडा प्रयत्न सुरू आहे. त्याची प्रवाशांना भीती वाटत आहे.

follow us