पुण्यात अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळ; भर सभेत मंचासमोर येत कडूंच्या समर्थकांनी ‘प्रहार’ करत घेरलं

Controversy In Ajit Pawar’s program in Pune : पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं समोर आलंय. प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ (Pune) निर्माण केला. हा राडा बच्चू कडूंच्या आंदोलनावरून झाला असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडला आहे. बच्चू भाऊंच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार (Bachchu Kadu) कोण? असा सवाल देखील प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
Ahmedabad plane crash मधील मृतांचा आकडा वाढला; मेडीकल कॉलेजमधील 34 जणांचा मृत्यू
अजित पवारांचं प्रहारच्या कार्यकर्त्यांना आश्वासन
चर्चा करायला गेले आहेत. स्वत: पालकमंत्री गेले आहेत. आम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत, असं देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतकऱ्यांना सरसकट सहा हजार पेन्शन, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. बच्चू कडू आमचे दैवत, असं म्हणत त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत. त्यांनी पुण्यात अजितदादांच्या चालू कार्यक्रमातच मोठा राडा केलाय.
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. याच्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घातला. न्याय देत नाही, तोवर मागे हटणार नाही अशी भूमिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला मिटिंग नको, न्याय हवाय. बच्चू भाऊंना काही झाल्यास, आम्ही दादाच्या सरकारला सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी; बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत घातला गोंधळ #AjitPawar #BachchuKadu #Farmer #Pune @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis pic.twitter.com/UAK1uyn1hd
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 14, 2025
कार्यकर्त्यांच्या राड्यावर बच्चू कडू काय म्हणतात?
यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर आली आहे. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात केले असेल. त्यांनी सांगितलं होतं की, अजितदादांच्या कार्यक्रमात जावून राडा करणार. मी त्यांना थांबवलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. कार्यकर्ते कुठे कमी पडणार नाही, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.