Download App

आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार; मात्र..शरद पवार यांचे मनपा निवडणुकांबद्दल मोठं विधान

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केलं.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar In Pimpri Chinchwad : अनेकदा चर्चा होते की आपण सर्वांना सोबत घेतलं पाहीजे. मात्र, सर्वांना म्हणजे कुणाला? जे शिव, शाहू फुले आंबेडकरांना मानतात. यशवंतराव चव्हाण यांना मानतात त्या लोकांना आपण सोबत नक्की घेऊ. मात्र, संधासाधू भाजपसोबत कदापीही युती होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Pawar) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण भाजपसोबत जोरदार लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

तसंच, यावेळी शरद पवार यांनी १९८० ची घटनाही सांगितली. ते म्हणाले,  त्यावेळी राष्ट्रवादीचे ७० आमदार निवडून आले. ते मोठ यश होत. त्याच दरम्यान, मी काही कामानिमीत्त १० दिवसांसाठी बाहेर गेलो होतो. त्या दहा दिवसांत मागं चमत्कार घडला आणि पक्षाचे निवडणून आलेल्या ७० आमदारांमधून ६४ आमदार पक्षाला सोडून गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांचे कष्ट, जनतेने ठेवलेला विश्वास हे सगळ विसरून त्यांनी हे पाऊल उचललं होत. मात्र, मी या घटनेने खचलो नाही. लोकांशी संपर्क वाढवला. पक्षात अधिक लक्ष दिलं. नवे कार्यकर्ते उभा राहिले. त्यानंतर ५ वर्षांनी निवडणूक झाली आणि जे सोडून गेले त्यातील ९० टक्के लोक पराभूत झाले होते. त्यामुळं असे संकट येत असतात त्याला न घाबरता पुढं जायच असंत असंही पवार यावेळी म्हणाले.

पण धीरूभाईंच्या मागे ईडी नाही लागली; त्या वक्तव्यावरून राऊतांचा अजित पवारांना टोला

गेले त्यांची चिंता करू नका

निवडणुका येतात आणि जातात. पण त्या निवडणुकीत आपण लक्ष दिलं पाहिजे. एका विचारानं काम करणाऱ्या संघटनेची गरज आहे. हे संघटन राष्ट्रवादी देऊ शकतो. नवीन नेतृत्वाची फळी तयार करणं, नव्या नेतृत्वाच्या फळीतून विकासाचं कामकाज उभं करण्याची गरज आहे. विकासाच्या कामाला गती देण्यासाठी चित्र बदललं पाहिजे. नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी चांगली कामगिरी केली पाहिजे. हे करण्यासाठी संघटन मजबूत केलं पाहिजे. काही लोक गेले. नवीन काही लोक येत आहे. गेले त्यांची चिंता करू नका. अनेक लोक येत आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

लोकांना कळत

कोण आला, कोण गेला त्याची चिंता करू नका. लोक शहाणे आहेत. या देशाची लोकशाही नेत्यांमुळे टिकली नाही. सामान्य लोकांच्या सामुदायिक शहाणपण आणि एकीतून लोकशाही टिकली आहे. त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं आणि त्यासोबत उभं राहण्याचं काम करावं लागेल, असंही ते म्हणाले.

 

follow us