Download App

रायगडवर अभूतपूर्व गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, गडाचे दरवाजे बंद

Shiv Rajyabhishek ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. ( Shiv Rajyabhishek ceremony crowd on Raigad police baton charge on peoples )

रायगडावर उसळली शिवभक्तांची भगवी लाट; संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन, म्हणाले….

यावेळी रायगडावर ही गर्दी अनावर झाल्याचं पाहताच पोलिसांनी ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. गर्दी पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी शिवभक्तांवर सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला. त्यानंतर हळूहळू सर्व शिवभक्तांना किल्ल्यावरून खाली पायवाटेने सोडण्यात आलं.

Bal Shivaji: आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी’, राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

रायगडावर आज ३५० वा राज्याभिषेक दिन साजरा होत असल्यानं राज्यभरातील शिवभक्तांनी रायगडावर अलोट गर्दी केली. शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा होत असून या घोषणांनी रायगडाचा परिसर दुमदुमला आहे. यावेळी रायगडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायगडला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले होते.

डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनाचे फोटो

सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड किल्ल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, किल्ले रायगडावर जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने महाड ते रायगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळं सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्यानं शिवप्रेमी नाराज आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने राज्याभिषेकासाठी रायगडमध्ये दाखल झाले आहेत. या गर्दीमुळे गडावरील यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यंंत्रणेवरील आलेला ताण टाळण्यासाठी प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली. मात्र यावेळी रायगडावर ही गर्दी अनावर झाली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी शिवभक्तांवर सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला. त्यानंतर हळूहळू सर्व शिवभक्तांना किल्ल्यावरून खाली पायवाटेने सोडण्यात आलं.

Tags

follow us