Eknath Shinde : मी सगळ्यांना घरातून बाहेर आणलं, काम करू लागले; आजारी लोक बरे झाले

मी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढले, माझ्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि काम करू लागले. अगदी आजारी लोक बरे झाले, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की […]

Eknath Shinde

Eknath Shinde

मी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढले, माझ्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि काम करू लागले. अगदी आजारी लोक बरे झाले, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं.

या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही काम करत आहोत, राज्यात नवीन सरकार आल्यापासून आम्ही चांगलं काम करत आहोत. आमच्या आधी काही लोकांनी (उद्धव ठाकरे) लोकांना घरात बसवलं होत. पण मी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढले, माझ्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि काम करू लागले. अगदी आजारी लोक बरे झाले.

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य

निवडणुकांना घाबरत नाही

आम्ही निवडणुकांना घाबरत नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही साडेसात हजार ग्रामपंचायतीपैकी तब्बल साडेचार हजार ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे, लोक कोणासोबत आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकांना घाबरत नाही.

पण आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करत आहोंत. नवीन सरकार आल्यापासून वैयक्तिक लाभ देणारे कोणतेही निर्णय आम्ही घेत नाही. अगदी तुम्ही आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि नवीन सरकार आल्यापासून घेतलेले निर्णय तुम्ही पाहा, त्यावरून तुम्हाला कळेल अशी माहिती त्यांनी सांगितली.

Exit mobile version