Download App

जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण लाईटली घेतलं म्हणूनच..,; संभाजीराजेंनी A to Z सांगितलं

विशाळगड अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी लाईटली घेतलं म्हणूनच अतिक्रमण मोहिम हाती असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sambhajiraje Chatrapati : कोल्हापुरातील विशाळगड (Vishalgarth) परिसरातील अतिक्रमणाबाबत काढण्याचे आदेश असतानाही प्रशासनाकडून काढण्यात आले नाही, जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र, लाईटली घेण्यात आलं त्यामुळेच आम्ही शिवभक्तांची अतिक्रमणाची मोहिम हाती घेतल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रविवारी संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजेंवर आरोप करण्यात आले. या आरोपांवर संभाजीराजे यांनी उत्तर दिलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शंकराचार्यांनी सांगितलयं, ‘विश्वासघात’ हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप; ठाकरेंचा शिंदे गटावर रोख

संभाजीराजे म्हणाले, विशाळगडावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहेत. विशाळगडासह पायथ्याला जवळपास 160 अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणाबाबत काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून ही अतिक्रमणे काढण्यात आलेले नाहीत. यातील काहीच अतिक्रमणे न्यायप्रविष्ट आहेत मात्र, इतर सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आहेत. या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना काढण्याचे सांगितलं मात्र त्यांनी लाईटली घेतल्यानेच आम्ही शिवभक्तांनी अतिक्रमण मोहिम हाती घेतल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान परिसरातील वाहनांची आणि घरांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या घटनेनंतर पोलिसांकडून आता या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलायं.

फडणवीसांनी नाही विश्वासघात ठाकरेंनीच केला; मातोश्री भेटीवरून शंकराचार्य-महंतांमध्ये मतभेद

काय आहे नेमकं प्रकरण?
विशाळगडावर सुमारे 158 अतिक्रमण आहेत यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे हे न्यायालयीन वाद सुरू असलेले अतिक्रमण सोडून अन्य अतिक्रमण काढण्यात यावीत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवभक्तांकडून विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येत होती. याच मागणीसाठी रविवारी 14 जुलैला काही शिवभक्त थेट हे अतिक्रमण हटवण्यासाठी विशालगडावर पोहोचले. मात्र यावेळी हे आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

संतप्त जमावाने गडाच्या शेजारीच असलेल्या गजापूर या ठिकाणी काही घर दारासमोर लावलेल्या गाड्या त्यांच्यावर दगडफेक केली गाड्या उलथून टाकल्या तसेच घराला लावलेल्या आहेत. एका सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र ही आग वेळीच नियंत्रणात आणल्याने अनर्थ टाळला. तसेच यामध्ये तलवारी, कोळते, कुदळ या शस्त्रांचा देखील वापर करण्यात आला. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला.

follow us