Abu Azmi in danger after praising Aurangzeb : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमनं आझमींनी उधळली. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर त्यांचं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबन देखील केलं गेलं आहे. मात्र आता आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी सांगितंलं आहे.
एक अविश्वसनीय प्रेमकथेचा प्रवास, “माझी प्रारतना” सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
आझमी म्हणाले की, या वक्तव्यानंतर आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यासाठी मी आता पोलीस प्रोटेक्शन साठी अर्ज करणार आहे आता या दरम्यान माझ्या जीवाला काहीच झाले अस त्याला सरकार जबाबदार असेल असेही यावेळी म्हणाले. मला या अधिवेशनांमधून निलंबित करण्यात आलं आहे. मात्र मी केलेलं विधान सभागृहात केलेलं विधान नव्हतं. तसेच मी कोणत्याही महापुरुषाचा अपमान केला नाही. अशाच प्रकारची कारवाई राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोरटकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. असंही ते म्हणाले.
चौथी मुंबई कुठे होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
दरम्यान सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर आझमी यांचा सूर नरमला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स या सोशलमिडीया साईटवर आपलं वक्तव्य मागे घेतलं असल्याचं सांगितलं. तसेच ते म्हणाले की, माझ्या वक्तवायचा अपभ्रंश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, औरंगजेब रहमतुल्लाह आलेह यांच्याबद्दल मी तेच बोललो. जे इतिहासकार आणि लेखकांनी सांगितलं आहे.
Video : धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी धमकी दिली का? CM फडणवीसांनी खरं खरं सांगून टाकलं…
तसेच मी छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं नाही. मात्र माझ्या या वक्तव्याचा कुणाला त्रास झाला असेल तर मी माझं वक्तव्य परत घेतो. तसेच माझ्या या वक्तव्याला राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे. ज्याचा वापर महाराष्ट्र विधानसभा सभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करण्यासाठी होत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होत आहे. असंही ते म्हणाले होते.
आज आझमींनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आजही विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अबू आझमींवर घणाघाती टीका केली. सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. यानंतर अधिवेशन संपेपर्यंत आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले. यानंतर विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अबू आझमीला शंभर टक्के तुरुंगात टाकू असा इशारा दिला.