Download App

दोन फास्ट लोकल…रेल्वे रूळावर मृत्यूतांडव कसं झालं? मध्य रेल्वे प्रशासनाने केला मोठा खुलासा

Central Railway Press Conference After Mumbai Local Accident : मुंबई लोकलमधून (Mumbai Local Accident) आठ प्रवासी पडले, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झालाय. दोन लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले (Mumbai News) गेले. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असं मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केलं आहे. दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेची (Central Railway) पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी बोलताना जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी म्हटलंय की, दोन लोकल ट्रेन होत्या. एका कसाऱ्याच्या दिशेने तर दुसरी सीएसएमटीच्या दिशेने जात होती. दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरूद्ध दिशेने जात (Central Railway Press Conference) होत्या. तेव्हा काही प्रवासी फुटबोर्डवर लटकलेले होते. ते प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे ही दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसचा यात काहीही संबंध नाही. ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान आठ जण रेल्वेतून पडले, असं देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना! 12 जण रेल्वे ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू

लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू

आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधाराने आठ लोकं मु्ंब्रा आणि दिवा या दोन स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून प्रवास करत असताना एकमेकांना घासून खाली पडले. ही सगळी लोकं लोकलच्या फुटबोर्डवर प्रवास करत होती. अप आणि डाऊनच्या लोकलमधील लोकं एकमेकांना आपापसात घासली गेली. यामुळे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले होते. सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान ही घटना घडली आहे.

राज्यात मान्सून पुन्हा कधी सक्रीय होणार? कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला यलो अलर्ट

दुर्घटना कशी घडली?

घटनास्थळी 9 वाजून 50 मिनिटांनी रूग्णवाहिका पोहोचली. सगळ्या व्यक्तींना तातडीने रूग्णालयात घेवून जाण्यात आलंय. लवकरच रूग्णालय त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देईल, असंही त्यांनी म्हटले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या रूग्णानेच ही माहिती दिली आहे. या दोन्ही गाड्या लोकल ट्रेन होत्या. दोन लोकल विरूद्ध दिशेने जात होत्या. यामध्ये पुष्करचा उल्लेख नाही, असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. हे दोन्ही लोकल ट्र्रॅकमधील अंतर दोन ते अडीच मीटर असते. प्रवासी फुटबोर्डवर प्रवास करत होते, मागे त्यांनी बॅगा लटकलेल्या होत्या. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

वाढत्या गर्दीवर मध्य रेल्वेचे काय नियोजन?

लोकलची गर्दी अन् अपघात ही गोष्ट मध्य रेल्वे प्रशासनासाठी नवीन नाही. यासाठी मात्र प्रशासन काम करत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माहिती दिली की, मुंबईत दहा हजार कोटी रूपयांचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यामध्ये अॅडिशनल लाईन्सचे काम सुरू आहे. सीएसएमटीपर्यंत सहावी लाईन टाकली जाणार आहे. कल्याण ते कसारा तिसरी रेल्वे लाईन, सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सर्व लोकल डबे बारावरून पंधरापर्यंत करणार आहे.

 

follow us