Download App

मी गद्दारांना हलवणारच.., वरळीतून आदित्य ठाकरेंची विरोधकांवर तोफ

मुंबई : गद्दारांनी लक्षात ठेवावं हा थोड्या दिवसांचा खेळ आहे, तुम्हाला जागा दाखवून देणार असल्याची तोफ उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर डागली आहे. आदित्य ठाकरेंनी आज वरळीतील जाहीर सभेतून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच एकूण 40 आमदारांना चांगलच धारेवर धरलं आहे.

ठाकरे म्हणाले, गद्दारांविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोष आहे. महाराष्ट्राला अंधकारात नेण्याचं काम सध्या राज्य सरकाकडून सुरु आहे. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे? हाच प्रश्न आम्हाला पडला आहे. सरकार बदललं की प्रकल्प बाहेर राज्यात चालले आहेत. तुम्ही आणखी किती दिवस फसवणुकीचं राज्य चालवणार असल्याचा सवालही त्यांनी केला आहे.

Chinchwad Bypoll मतदानाचा कमी टक्का… कुणाला धक्का!

तसेच लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सरकार करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपकडून वापर केला जात आहे. उद्या कदाचित ते म्हणतील आम्ही महारष्ट्राचे नाहीत गुवाहाटीचे आहोत.

आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, राम शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

अनेकांना मंत्रिमंडळाची आशा आहे, पण माझ्याकडून लिहून घ्या, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं ठामपणे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. जनता हेच आमचं धन आहे. विरोधकांकडून यंत्रणेचा भयानकपणे वापर होतोय. हे सरकार बिल्डर कंत्रांटदारांचं झाल्याचं आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 10.45 टक्के मतदान

घटनाबाह्य सरकार लवकच कोसळणार आहे. विरोधक आमचे बॅनर काढत आहेत पण जनतेच्या मनातून ते कसं काढणार? असा सवालही त्यांनी केला आहे. दहा महिने झाले काहीतरी काम लोकांना दाखवा, असा सल्लाही त्यांनी सत्ताधारी सरकारला दिलाय. कोणीही 50 खोके बोलला तर त्याच्यामागे हे लोकं पोलिस लावत असल्याचंही त्यांनी म्हटंलय.

Tags

follow us