Download App

Sanjay Raut : ‘मोदींनी पकोडे तळायला सांगितलंय ना’.. राऊतांचा अजितदादांना खोचक टोला

Sanjay Raut replies Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला होता. त्यांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राजकारणातूनही प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजितदादांच्याा वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विविध मु्द्द्यावर बोलत असतानाच पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावेळी संजय राऊत यांनी एकाच वाक्यात उत्तर देत हा विषय निकाली काढला. मोदींनी पकोडे तळायला सांगितलं आहे ना, असा मिश्किल टोला राऊत यांनी लगावला.

Ajit Pawar : ‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’; अजितदादांनी सांगितलं पडद्यामागचं पॉलिटिक्स

सभागृहात काय घडलं होतं ?

बार्टी, सारथी, महाज्योती संस्थेमार्फत अनेक विद्यार्थी फेलोशीप घेत असतात. राज्य सरकारकडून 29 मार्चला विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या शर्ती आणि अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, त्याआधीच 1329 विद्यार्थ्यांनी फेलोशीप मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचं नुकसान न होता त्यांना फेलोशिपचा लाभ मिळावा. राज्य सरकारने पुढील वर्षीपासून अटींची अंमलबजावणी करावी अशी मागणी सतेज पाटलांनी केली होती. त्यावर बोलताना अजित पवार आणि सतेज पाटलांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार म्हणाले, बार्टी, महाज्योती आणि सारथी संस्थांवर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांनी फेलोशीप निधी देण्याची मागणी सातत्याने होती. एवढ्या मुलांना खरंच पीएचडी करण्याची खरंच गरज आहे काय? त्यासाठी समिती नेमून त्याचा निर्णय घ्यायचा आहे. सारथी संस्थेमार्फत पीएचडीसाठी 200 विद्यार्थ्यांची संख्या आणि परदेशात जाण्यासाठी 75 विद्यार्थी, अशी संख्या करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.

फेलोशीप घेऊन काय करणार आहेत? पीएचडी घेतील ना दादा, त्यावर दादांनीही प्रतिसवाल करीत पीएचडी करुन काय दिवा लावणार आहेत, असं प्रत्युत्तर दिलं. त्यावरही सतेज पाटलांनी असं कसं म्हणता येईल दादा.. असं मिश्किल अंदाजात उत्तर दिलं.

Sanjay Raut : तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही; राऊतांचा हल्लाबोल

Tags

follow us