Download App

Amit Shah: सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलंय -अमित शहा

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२२-२३ मध्ये साठी जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कारांचं वितरण शहा यांच्या उपस्थितीत झालं.

  • Written By: Last Updated:

Performance Award Ceremony : सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलं आहे. आमचं लग्न शेतकऱ्याशी आणि शेतीशी झालं आहे. आम्हाला आमचे कारखाने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवावे लागतील. (Award Ceremony) त्यासाठी पुढच्या दोन वर्षांत कार्यक्षमता वाढवून उलाढाल २५ टक्क्यांनी वाढवण्याचं लक्ष्य ठेवावं, असं मतकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२२-२३ मध्ये साठी जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कारांच्या वितरण समारंभात ते बोलत होते.

अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, उद्धव ठाकरेंची भाजपा नेते अमित शाहंवर घणाघाती टीका

दिल्लीतील जनपथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये कार्यक्रम झाला. साखर कारखाने जेवढी इथेनॉल निर्मिती आणि ऊस उत्पादन कराल ते सर्व जगात निर्यात करण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. त्यासाठी साखर उद्योगाने दोन वर्षे संयम बाळगावा, असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.

या पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, गुजरातचे माजी मंत्री ईश्वरभाई पटेल, उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व्यासपीठावर उपस्थित होते. पहिल्या तीन पुरस्कारांचे वितरण अमित शहा यांच्या हस्ते झालं. उर्वरित अठरा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या हस्ते देण्यात आले.

राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिली ? उत्तर द्या, अमित शहांचा शरद पवारांना सवाल

हर्षवर्धन पाटील यांच्या मागण्या

काय म्हणाले अमित शहा?

follow us