Bengaluru Stampede Chinnaswamy Stadium Father Crying For son : बेंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम सध्या केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएलमधील विजयामुळेच नव्हे तर सर्वांसमोर आलेल्या वेदनादायक चित्रामुळे चर्चेत आहे. बुधवारी (Bengaluru Stampede) आरसीबीने 18 वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकले, तेव्हा स्टेडियममध्ये (RCB Celebration) त्याच्या सन्मानार्थ उत्सव सुरू होता, परंतु त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत एका वडिलांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला. तशवविच्छेदन न करता (Chinnaswamy Stadium) ते आपल्या मुलाचा मृतदेह मागत आहे.
वडील म्हणाले, त्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू नका, त्याचा मृतदेह मला द्या. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका. वडिलांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला टाहो फोडला आहे. माझा एकुलता एक मुलगा होता आणि आज मी त्यालाही गमावले. तो मला न सांगता इथे आला. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे येतील, भेट देतील पण माझ्या मुलाला कोणीही परत आणू शकत नाही, असं म्हणत त्यांनी आक्रोश केला.
जीवघेणा जल्लोष! आरसीबीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची ‘पाच’ प्रमुख कारणे समोर; प्रशासन, सरकार अन्…
अफवांमुळे झाली चेंगराचेंगरी
18 वर्षांनंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) च्या पहिल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. क्रिकेट चाहते त्यांच्या संघाच्या विजयाच्या आनंदात सामील होण्यासाठी जमले होते. दरम्यान, मोफत तिकिटांची अफवा पसरली आणि ही अफवा एका मोठ्या अपघाताचे कारण बनली. आत उत्सव सुरूच होता, त्यामुळे बाहेरची परिस्थिती आणखी बिकट झाली. मोठ्या संख्येने लोक जमले आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले.
मोठी बातमी! कॉंग्रेसचा निष्ठावंत नेता अजितदादांच्या गळाला, बुलढाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक लोक बेशुद्ध पडले आणि त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या चेंगराचेंगरीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चेंगराचेंगरी कशामुळे झाली याची चौकशी केली जाईल. 15 दिवसांत अहवाल येण्याची अपेक्षा आहे.
कार्यक्रमस्थळी गर्दी झाल्याबद्दल माफी मागताना, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, कार्यक्रम लहान ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बेंगळुरू अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, या दुःखद क्षणी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेल्यांचे लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो.