Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगावरील औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली. येत्या 3 वर्षात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. अशी 200 केंद्रे पुढील आर्थिक वर्षातच बांधली जातील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
#UnionBudget2025 | Finance Minister Nirmala Sitharaman says, " I am now happy to announce that there will be no income tax up to an income of Rs 12 lakhs." pic.twitter.com/rDUEulG3b9
— ANI (@ANI) February 1, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मोठी घोषणा करण्यात आली आहे; त्यांना चार वर्षांसाठी रिटर्न भरता येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करण्यात आली आहे. तसेच आयटीआर आणि टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली असून, टीडीएस मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, 36 जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. कर्करोगावरील उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. 6 जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून 5 टक्के करण्यात येणार आहे.
जीवरक्षक औषधे स्वस्त होतील. कॅन्सरची औषधे स्वस्त होतील. एलईडी-एलसीडी टीव्हीच्या किमती कमी होतील. यांवर लावण्यात येणारे कस्टम ड्युटी कमी करण्यात आली. लिथियम आयन बॅटरी स्वस्त होतील. ईव्ही आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.
तरुणांच्या मनात कुतूहल, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारांना चालना देण्यासाठी येत्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५०,००० अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर विधेयकाबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. सरकार पुढील आठवड्यात आयकराचे नवीन विधेयक आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी करदात्यांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. असे मानले जात होते की जुन्या आणि नवीन दोन्ही आयकर प्रणालींमध्ये करदात्यांना अनेक सूट आणि कपात दिली जाऊ शकते. मात्र ही प्रतीक्षा आठवडाभराने वाढली आहे.
#UnionBudget2025 | "I propose to introduce the New Income Tax Bill next week," says FM Nirmala Sitharaman in Parliament pic.twitter.com/yfHIjzyMxu
— ANI (@ANI) February 1, 2025
गरिबांसाठी मोठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख अपूर्ण घरे पूर्ण केली जाणार आहेत.यामुळे घराचं स्वप्न बघणाऱ्या गरिबांना हक्काचं घर मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयआयटीमध्ये ६५०० जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 3 AI केंद्रे उघडली जातील. याशिवाय 5 वर्षात मेडिकलमध्ये 7500 जागा वाढवण्यात येणार आहेत. एआय शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचे बजेट.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या जातील. यात
१. कर आकारणी (Taxation)
२. शहरी विकास (Urban Development)
३. खाण क्षेत्र (Mining)
४. आर्थिक क्षेत्र (Financial Sector)
५. वीज आणि ऊर्जा क्षेत्र (Power Sector)
६. नियामक सुधारणा (Regulatory Reforms)
एमएसएमई क्षेत्र
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या एक कोटी आहे आणि त्यांच्याशी ५.७ कोटी लोक जोडलेले आहेत. हे भारताला जगात उत्पादन केंद्र बनविण्यासाठी उपयुक्त आहे. या एमएसएमईजचा निर्यातीत ४५ टक्के वाटा आहे. एमएसएमईंसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवले जाणार असून एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट वाढवली जाईल. वर्गीकरणासाठी उलाढाल मर्यादा दुप्पट केली जाणार.
कस्टमाइज्ड क्रेडिट
सूक्ष्म उद्योगांसाठी ५ लाख रुपयांच्या मर्यादेसह कस्टमाइज्ड क्रेडिट्स जारी केले जातील. पहिल्या वर्षी अशी १० लाख कार्डे दिली जातील.
मुदत कर्ज
पहिल्यांदाच उद्योजकांना २ कोटी रुपयांचे मुदत कर्ज दिले जाईल. पाच लाख महिला आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोक त्याच्या कक्षेत येतील.
#UnionBudget2025 | Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "The investment and turnover limits for classification of all MSMEs will be enhanced to 2.5 and 2 times respectively. This will give them the confidence to grow and generate employment for our youth." pic.twitter.com/VNP0Clgj7f
— ANI (@ANI) February 1, 2025