Download App

‘आता मानगुटीवर बसूनच सत्तेतून खेचणार’; मोदींच्या पराभवासाठी लालूप्रसाद यादवांनी कंबर कसली

  • Written By: Last Updated:

Lalu Prasad Yadav On PM Narendra Modi : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे देखील मुंबईत पोहोचले आहेच. दरम्यान, मुंबईतील बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा खरपूस समाचार घेतला. नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच जात आहोत. त्यांना सत्तेतून खेचायचं आहे, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आता आम्ही मुंबईत नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायला चाललो आहोत. नरेंद्र मोदी हे गादी पकडून बसले आहेत. त्यांना आता हटवायचं आहे, असा निर्धारच आम्ही केला आहे, असं ते म्हणाले. लालूप्रसाद यांचा हा आक्रमक अभिनिवेश पाहून कार्यकर्त्यांना नवं बळ मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

भाजपची झोप उडाली
जेव्हापासून आमच्या आघाडीने इंडिया हे नाव घेतलं, तेव्हापासून भाजपची झोप उडाली आहे, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. भाजपविरोधात आम्ही देशभरात ताकतीने लढणार आहोत. प्रत्येक जागेवर थेट लढत होणार आहे. एका बाजूला भापज आणि त्यांच्या विरोधात इंडियाचा उमेदवार असणार आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी हे पदावरून हटणार आहेत, हे निश्चित असल्याचंही लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

हरेगाव अमानुष मारहाण प्रकरण; केंद्रीय मंत्री रामदास आठवले पीडितांची भेट घेणार 

आमची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे लोक एकत्र येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान नको आहे. या देशाची अखंडत्व आम्ही संपू देणार नाही. बाबासाहेबांचे विचार आम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवू, असेही लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

लालूप्रसाद यादव यांचा विश्वास पाहता मुंबईत होणाऱ्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, असा दावाही केला जात आहे. तसेच या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचे देशाच्या राजकारणावर परिणाम पडेल, असं मानलं जात आहे.

Tags

follow us