PM Modi Assures Victims Of Pahalgam Terror Attack Justice : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय. आज मन की बात कार्यक्रमाचा 121 वा भाग पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय, त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिलंय. ते म्हणाले, (Pahalgam Terror Attack) ‘दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल.
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झालंय. प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळ करतंय.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; महाराष्ट्र पोलिसांबद्दल ‘ते’ वक्तव्य भोवलं
पहलगाममधील हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा भ्याडपणा दर्शवितो. या काळात काश्मीरमध्ये शांतता परतत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही.
दहशतवाद्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे, म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्याचा आपला निर्धार आपल्याला बळकट करायचा आहे. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल.
महिंद्राची खास स्ट्रॅटेजी! SML इसुजूत साडेपाचशे कोटींची भागादारी अन् वाहन बाजारातही दावेदारी
या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल.