Download App

हवामान विभागाकडून ऑक्टोबर ते डिसेंबरमधील अंदाज जाहीर; आज राज्यात कुठं-कुठं पाऊस बरसणार?

महाराष्ट्रासह राज्यासह देशातील नऊ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • Written By: Last Updated:

Weather Update : सध्या देशभरात मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला आहे. (Weather Update) यानंतर काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील आठवडाभरापासून देशातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मात्र काही दिवासांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

आज कुठे पाऊस होणार?

महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर, इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मोठी बातमी! मुकेश अंबानी अन् अनंत अंबानी मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत काय झाली चर्चा

ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) आणि मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत महाराक्षतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे. दरम्यान, सप्टेंबरअखेर देशात ९३४.८ मिलिमीटर (८ टक्यो अधिक) पाऊस झाला, यंदाच्या हंगामात १२ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल आहे. मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये पोहोचाता. जरबी समुद्रातून प्रगती करत ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला.

महाराष्ट्रात सर्वाधिक ३९ टक्के

मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून आहे. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे यंदा ओसंडून वाहिली. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे कोयना, उजनी आणि जायकवाडी धरणांत 10o टक्के पाणीसाठा असून, सर्वच मोठ्या परणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी जमा झाले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील बारही विभागांत पावसाने सरासरी ओलांडती आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक ३९ टक्के पाऊस झाला आहे तर कोकण- गोवा विभागात २९ टक्के अधिक, मराठवाडयात २० टक्के अधिक, तर विदर्भात १७ टक्के अधिक पाऊस आल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.

follow us