Download App

जर शक्ती आहे तर ती अशावेळी दिसली पाहिजे…पहलगाम हल्ल्यानंतर मोहन भागवत काय म्हणाले?

रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला

  • Written By: Last Updated:

RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यावर मोहन भागवतांनी भाष्य केलं आहे. आपण सगळे एक असून तर कुणीही आपल्याकडे डोळं वाकडे करुन बघणार नाही असं ते म्हणाले. ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे. काल धर्म विचारून मारलं. हिंदू असं कधीही करणार नाही. (Pahalgam) आपल्या मनात दुख आहे. आमच्या मनात क्रोध आहे. असुरांचे निर्दालन व्हायचं असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. ते मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

ब्रेकिंग : शोधून ठोकणार! पहलगाममधील दहशतवादी शेखचं घर जमीनदोस्त

रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला असंही भागवत यावेळी म्हणाले आहेत. वेगळेपणाला धरुन जेव्हा जातो त्यावेळी समाजातील अंतर वाढते. एकतेच्या सूत्राला धरुन चाललं की आपलेपणा वाढतो. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो असं मोहन भागवत म्हणाले. यावेळी क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे. ती पूर्ण होईल असंही मोहन भागवत म्हणाले.

यावेळी अपेक्षा पूर्ण होतील

मोहन भागवत पुढे म्हणाले की, “आता क्रोधही आहे आणि अपेक्षाही आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असेही वाटते. समाज एक असेल तर कुणी डोळं वाकडं करुन पाहणार नाही. वाकडं कुणी पाहीलं तर डोळा फुटेल. त्याला दमदार उत्तर देऊ अशी अशी अपेक्षा. द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. तसा मार खाणे हाही आपला स्वभाव नाही. शक्तिवान माणसाने अहिंसक असले पाहिजे. शक्तिहिनाला त्याची गरज नाही. शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे.”

नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाल्याची कबुली केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत दिली आहे. काश्मीरमधल्या हल्ल्यानंतर सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दोन तास चालली. त्यात हल्ला झाला तेव्हा सुरक्षा दल, सीआरपीएफ कुठं होतं, मदत पोहोचण्यात उशीर का झाला? अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षांनी केली. त्यावर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मान्य केलं. त्याचा शोध घेण्याची हमीही त्यांनी विरोधकांना दिली. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल, त्यासाठी आपण सरकारच्या सोबत आहोत असं आश्वासन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधकांनी दिलं.

follow us