Download App

राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय?; नांदगावकरही संभ्रमात म्हणाले, उत्तराचा…

Bala Nandgaonkar यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर विचारले असता. ते देखील संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं.

Bala Nandgaonkar on Raj and Udhhav Thackeray Allince : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या मनसे आणि ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता शिवसेनच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात (Raj Thackeray) बोलताना उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. मात्र यावर अद्याप मनसेकडून काहीही हालचाली दिसत नाहीत. यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना विचारले असता. ते देखील संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत विचारण्यात आलेय त्यावर बोलताना नांदगावकर संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, मी ही राज साहेबांना विचारात आहे की, तुमच्या मनात नेमकं काय सुरु आहे. पण मला अजून उत्तर सापडत नाही. उत्तर सापडलं की, मी तुम्हाला नक्की सांगेन, चिंता करू नका. अशी प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न, एका वाक्यातच संपवला विषय

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, याबाबतीत राज ठाकरे साहेबांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे असतानाचा तो काळ होता, त्यावेळेस उद्धव आणि राज यांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न केला. पण एखादी गोष्ट झाली, तर राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं. पण पुढे काय होईल, याची मला कल्पना नाही. राजकारणात वेळ नेहमीच येत असते, मात्र कुठलीच वेळ कधी वाईट नसते. महाभारतात एक वाक्य आहे, ‘समय बडा बलवान होता है.’ या वाक्यात बरेच काही अर्थ असतात.

‘६० वर्षांत काहीच केलं नाही’ म्हणणाऱ्या भाजपचा काँग्रेसच्या राजकीय घराण्यांना रेड कार्पेट का?

मी शिवसेनेमध्ये असताना सोलापूरचा संपर्कप्रमुख होतो.त्यावेळेस मी माझ्या नेतृत्वामध्ये चार आमदार ही निवडून आणले होते.त्यातील एक मंत्री झाले होते. त्यावेळेसपासून माझे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या स्तरावर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते माझ्या कुटुंबातील लोक आहेत, आणि बाळा नांदगावकर सोलापूरला आल्यानंतर ते नेहमीच भेटायला येतात. आणि मुंबईला आल्यावरही मला भेटतात. सोलापूरवर माझं विशेष प्रेम पूर्वीही होतं, आताही आहे आणि कायम राहील.

बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय?, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर थेट वार

त्याचबरोबर यावेळी ते हिंदी भाषा सक्तीवर देखील बोलले. ते म्हणाले की, या संदर्भात मनसेची काल बैठक झाली. त्यामध्ये पूर्णपणे हिंदी भाषेला विरोध करायचं ठरल आहे. हिंदी भाषेविषयी आमचं काही वावड नाही. मात्र हिंदी राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे. कोणत्याही राज्यावरती कोणती भाषा सक्ती होता कामा नये. राज्य निर्मिती झाली त्यावेळेस भाषिक प्रांत रचना झाली होती. पण हिंदी भाषा लादणार असतील, तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला आमची विनंती आहे. गरज नसताना एखादा विषय वाढवू नये, तो विषय योग्य वेळेला संपवणे चांगल असत. जर उत्तर प्रदेशमध्ये मराठी भाषा घेत असतील तर इथं ही बघता येईल.

follow us