Download App

भ्रष्टाचार त्यांचा रक्तात, नाना पटोलेंनी भाजपवर डागली तोफ

  • Written By: Last Updated:

Nana Patole On BJP : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नुकतेच भाजपने ऑपरेशन लोटस नुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. आपल्या सत्तेचा उपयोग करत गरज नसताना अजित पवारांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले. भाजपच्या या कृतीवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर तोफ डागली. नाना म्हणाले भ्रष्टाचार हा भाजपच्या विचारात आणि डी.एन.ए मध्ये आहे. आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली त्यानंतर नाना पत्रकारांशी बोलत होते. ( Corruption is in their blood: Nana Patole’s criticism of BJP)

पुढे बोलताना नाना म्हणाले राहुल गांधी भारत जोडो यात्रा वेळी ज्या पद्धतीने भाजप वातावरण तयार केले. तेव्हा भाजपवाले म्हणत होते कि काँग्रेस नेते पक्ष सोडून जातील. भाजपने काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक वातावरण तयार केले आहे. भोपाळमध्ये राष्ट्रवादी वर आरोप केले आणि नंतर पक्ष फोडला आणि दोन दिवसात पाप केले. असा टोला यावेळी नानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

तिकडे बुलढाण्यात बस अपघात लोकांचे मृत्यू झालं. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि राजभवनात जय घोष सुरू होता. भाजपने मनाची पण लाज ठेवली नाही असे म्हणत नानांनी भाजपाची लाज काढली. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही म्हणून असले उधोग भाजप जाणीवपूर्वक करत आहे.

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र

भाजप लोकांना विकासापेक्षा पक्ष कसा फोडला जातो हे दाखवत आहे. देशात भाजपने लोकशाही शिल्लक ठेवली नाही. जो विरोधात जाईल त्याला ED चे भय दाखून सोबत घेण्याचे काम भाजप करत आहे. अजित पवार त्याचे ताजे उदाहरण आहे. जनतेच्या प्रश्नावर बोलण्याचे सोडून भाजप काँग्रेस फुटणार हे सांगते. दुसऱ्याची घर फोडणे हा भाजपचा फंडा आहे. अशी टीका यावेळी नानांनी केली.

भाजप लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही. जुलै महिना आला अजून पेरण्या झाले नाहीत. अवकाळी पाऊसाची मदत केली नाही. महागाई बेरोजगारी हे प्रश्न टाळण्यासाठी अशा बातम्या भाजपकडून पसरवल्या जात आहे.

Tags

follow us