Download App

मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला : रावणराज चालवले… म्हणूनच जनतेने त्यांना हटवले!

Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांचेच रावणाच राज्य होते. त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणून त्यांना जनतेने हटवले आहे, अशी जहरी टीका उद्भव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासारख्या काही जणांना हिंदू धर्माची, हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. तर काही जण सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे, असे म्हणत काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यावर देखील त्यांनी यावेळी सडकून टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्व खासदार, आमदार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद, पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे यांनाही टोले लगावले.

Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूंची अलर्जी होतेय! – Letsupp

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या दौऱ्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. मात्र, माझ्या आयुष्यातील आजचा सर्वात आंनदाचा मोठा दिवस आहे. तर काही लोकांना (राहुल गांधी) हिंदुत्वची अलार्जी आहे. ४०० वरून ४० वर आले आहेत. आता दुकान बंद होण्याची त्यांना भीती वाटत आहे, असे म्हणत राहुल गांधी यांना टोला लगावला.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार यांना हिंदू धर्माची, हिंदुत्वाची अलर्जी असल्याने ते माझ्या अयोध्या दौऱ्याला फालतू म्हणत आहे. पण, रामलल्ला त्यांना चांगला धडा शिकवेल. तर जो पक्ष ४०० वर होता. त्यांनी हिंदू, हिंदुत्व नाकारले म्हणून आज ४० वर येऊन पोहोचले आहेत. परंतु, आजही ते आत्मपरीक्षण करत नाहीत, बोध घेत नाहीत, असे म्हणत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Tags

follow us