Download App

Maratha Reservation : ‘आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर…’; मनोज जरांगेंनी भुजबळांना धुतलंच

Manoj Jarange on chagan Bhujbal : आम्हाला डिवचू नको, आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर पॅन्टित शिरल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal)धुतलं आहे. मनोज जरांगेंच्या राज्यभरात जाहीर सभा होत आहेत. जरांगे पाटील यांची सभा आज अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

Girish Mahajan : ‘सोंगं करायची, उपचार घ्यायचे अन् पुन्हा आरोप करायचे’; महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील, कुणी कितीही विरोध टोळी करु द्या, टोळी मुकादम घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. मुकादम म्हातारं झालं तरी वळवळ करतंयं. या वयातही कळत नाही काय करावं काय नाही. वेगळाच मुकादम आहे याला दमच निघत नाही. आरक्षणाला विरोध केला तर तो कोणीही असो सोडीतच नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Manoj Jarange : …तर भुजबळांची राजकीय पोळी कशी भाजणार? जरांगेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं

तसेच मी गप्प होतोत तर गप बसायचं ना, अंबडला जाऊन कशाला डिवचायचं. वय झाल्यावर माणसाला पचत नाही. खायची सवय लागली तर वरबाडून महाराष्ट्र सदन, जनतेचा पैसा सगळं खाल्लं आहे. म्हणूनच तर जेलमध्ये जाण्याची वेळ आलीयं. मी जेलमध्ये बेसन भाकर खाल्ली म्हणलं तर जेलमध्ये कांदेही मिळतेतं असं म्हणतोयं तर खा गोणीभर जसं काय लढाई जिंकून आलायं अस सांगत असल्याची टीकाही जरांगे पाटलांनी केली आहे.

मी भेंड्यात असताना येवल्यात छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्यावर लक्ष ठेवावं, नाहीतर मी शांत बसणार नाही. शिंदे-फडणवीसांनाही सांगतो, घटनेच्या पदावरच्या माणसाने कायदा पायदळी तुडवू नये, आमचे बॅनर फाडायचं सांगणं बंद करा, आम्हाला डिवचू नका जर आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर पॅन्टित शिरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Deepfake : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला जगाला डीपफेकचा धोका, एकत्र येण्याचे आवाहन

तुम्ही हे सगळे प्रकार ताबडतोब थांबवा ही मराठा समाजाकडून ही विनंती आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा. कितीही बोर्ड फाडले, तरीही आरक्षण मिळणारचं, नंतर बोर्ड तुझेपण आहेत. 24 डिसेंबर शांत रहायचं मग ते अन् आपण एकाच गल्लीत आहोत ,मग तेव्हा बघू असंही जरांगे म्हणाले आहेत.

दरम्यान, आता मराठा आरक्षणाच्या विजयाचा दिवस लवकरच येणार आहे. जातीजातीत भांडण लावण्याचं षडयंत्र त्यांच्याकडून सुरु आहे. हा त्यांचाच डाव आहे पण आपण अनेक डाव उधळले आहेत. मराठ्यांनी लक्ष विचलित होऊ देऊ नका, एकदा आरक्षण मिळाल्यावर बघू, असा सज्जड दमही मनोज जरांगेंनी भरला आहे.

follow us