Manoj Jarange : …तर भुजबळांची राजकीय पोळी कशी भाजणार? जरांगेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं

Manoj Jarange : …तर भुजबळांची राजकीय पोळी कशी भाजणार? जरांगेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं

Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) मनोज जरांगे हे (Manoj Jarange) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. यावेळी अहमदनगर दौऱ्यावर असताना जरांगे यांनी पुन्हा भुजबळांवर आरोप केले आहे.

…तर भुजबळांची राजकीय पोळी कशी भाजणार?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये असताना मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यावर प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना जरांगे पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं आहे. ते म्हणाले की, भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोधाची भुमिका घेतली आहे. त्यामागे राजकीय स्वार्थ आहे. कारण जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्यांची राजकीय पोळी कशी भाजणार याची चिंता आहे. असा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.

Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?

तसेच ते पुढे म्हणाले की, त्यामुळे भुजबळ जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणे करून त्यांना त्याचा फायदा घेता येईल. तसेच ते म्हणाले की, ते कीती जरी मराठा आणि ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत असले तरी गावाकडे मराठा आणि ओबीसी समाज एकत्र आहे. कित्येक ओबीसी लोकांना मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. माझ्याकडे त्यांची निवेदन आहेत. असं जरांगे म्हणाले.

भाऊ कदम अभिनयातून घेणार ब्रेक! कॉमेडीवीरच्या ‘त्या’ फोटोवरून चर्चांना उधाण

दरम्यान काल मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता सडकून टीका केली. तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचं काय करत होतास. मुंबईत काय-काय केलं. कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हे देखील मला माहिती आहे. तू महाराष्ट्रातल्या जनतेचं खाल्लंस. महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला. महाराष्ट्र सदनाचा पैसा हा राज्यातील जनतेचा होता. तो पैसा तू खाल्लास. त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेला अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube