Download App

‘स्वत;चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून’; देसाईंचं ठाकरेंना चारोळी स्टाईलने प्रत्युत्तर

Shambhuraj Desai On Udhav Thackeray : स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, या शब्दांत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना चारोळी स्टाईलने प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला शंभूराज देसाईंनी चारोळी स्टाईलने प्रत्युत्तर दिलं आहे.

Chhagan Bhujbal : ‘नवी वर्णव्यवस्था येतेय, लायकी काढली जाते’; भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

शंभूराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोकणात अतिवृष्टी, शेतकरी संकटात असताना तत्कालीन सरकारचे मंत्रीच अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पाहणी करीत होते. स्वत; उद्धव ठाकरे कधीच पाहणी करण्यासाठी गेलेले नाहीत, स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असं उद्धव करत असल्याचं टीकास्त्र शंभूराज देसाईंनी सोडलं आहे.

Rohit Pawar : ‘शेलार-फडणवीसांना अहंकार, कोण ‘लोणचं’ खाईल पाहू’; शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर

तसेच मी माध्यमांवर ऐकलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत, जर उद्धव ठाकरे अशा पद्धतीने मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत असतील तर आम्हालासुद्धा नाईलाजास्तव बोलावं लागणार हे तुम्हाला सांगावं लागत, असल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं आहे.

Maratha Rerervation : शिंदे समितीत काहीतरी गडबड; नाना पेटोलेंचा भुजबळांच्या सुरात सूर

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं. यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं सोडून स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढावलेले असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज कशी नाही वाटत? उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरही टीकेची तोफ डागली. यावेळी ठाकरेंनी मुख्य़मंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा एक फुल दोन हाफ असा उल्लेख केला. मधल्या काळात दुसरे हाफ छत्तीसगढला प्रचाराला गेले होते. तर, दुसऱ्या हाफला डेंग्यू झाला होता, ते कुठे आहेत त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे राज्याचा मायबाप नेमका कोण?, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे नेते आहेत. याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे.
चार भींतीच्या आत बसायचं, माध्यमांसमोर बोलायचं आणि चार जिल्ह्यांचा दौरा एक दिवसांत करायचं पण प्रत्यक्षात काहीही करायचं नसल्याची टीकाही शंभूराज देसाईंनी केली आहे.

Tags

follow us