Download App

नाना पटोले म्हणाले, मविआच्या वाढत्या प्रभावानं विरोधक धास्तावले

Nana patole On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद (Disagreement)नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha)होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar)यशस्वी सभेनंतर आता 16 तारखेला नागपुरात सभा होत आहे. त्यानंतर मुंबई (Mumbai)व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत, त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे काँग्रेसचे (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी म्हटले आहे.

बहिणीला घरात का आणले म्हणत आमदार क्षीरसागरांची वडिलांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल

नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही. मविआतील नेते एकमेकांना भेटत असतात, तशीच ही भेट झाली आहे. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे असा जर कोणी काढत असेल तर ते चुकीचे आहे.

महाविकास आघाडीत सुसूत्रता आहे, आजही आमची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होत असते. महाविकास आघाडी भक्कम आहे, त्याची भिती आमच्या विरोधी पक्षांना वाटत आहे. त्यामुळेच मविआची नागपूरची 16 तारखेची सभा होऊ नये म्हणून भाजपा त्यांच्या एका आमदाराला पुढे करुन विरोध करत आहे.

कोणी कितीही अडथळे आणले तरी महाविकास आघाडीची नागपुरातील वज्रमूठ सभा तर होणार आहे. त्याचबरोबर अमरावती, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि मुंबई येथील सभाही होणार आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या मुंबई भेटीसंदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, वेणुगोपाल हे मुंबईत येणार असल्याचा आमच्याकडे अजून कोणताही अधिकृत कार्यक्रम आलेला नाही, परंतु ते मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असतील तर त्यात वावगे काय? असेही पटोले म्हणाले.

Tags

follow us