Download App

Rahul Shevale : मनिषा कायंदेवर गंभीर आरोप करणाऱ्या ‘त्या’ पत्रावर राहुल शेवाळे म्हणाले…

Rahul Shevale : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. त्यानंतर त्यांनी सुषमा अंधारवर थेट टीका केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप करणारं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं पत्र व्हायरलं करत कायंदे यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल आता राहुल शेवाळेंना विचारले असता त्यांनी त्यावर अंधारे घाणेरडं राजकारण करत आहेत. असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. ( Rahul Shevale Criticize Suahma andhare on Letter of Mnisha kayande )

Suahma andhare : ‘मनीषा ताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे…’ ‘ते’ पत्र दाखवत अंधारेंची कायदेंवर टीका

काय म्हणाले राहुल शेवाळे ?

मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र आणि सुषमा अंधारेंच्या टीकेवर यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की, मनिषा कायंदे जेव्हा त्यांच्या पक्षात होत्या तेव्हा ते असे पत्र बाहेर काढत नाहीत. ते पत्र अगोदरच दिलेलं होतं त्यावेळीच ते काढायला पाहिजे होतं. पण आता त्या आरोप-प्रत्यारोपाचं घाणेरड राजकारण सुरू आहे. पण या घाणेरड्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही.

Jee Karda: ‘जी करदा’ मधील बोल्ड सीन्स व्हायरल; ‘तमन्ना’च्या भूमिकेवर चहाते फिदा

आम्हाला विकास कारायचा आहे. या आरोपांना उत्तर देण्यातही वेळ घालवणार नाही. तसेच या पत्रावर हे पत्र खरं असेल तर ती मागणी लावून धरणार का? असा प्रश्न विचारला असता राहुल शेवाळे म्हणाले की, या संदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री घेतील. असं म्हणत त्यांनी या प्रश्नला टाळलं आहे.

काय आहे हे पत्र?

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मनिषा कायंदे या ठाकरे गटामध्ये असताना त्यांच्यावर गंभीर आरोप केलेलं एक पत्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले होते. यामध्ये त्यांनी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांच्याकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगग आणि धमकी करिता केलेल्या गुंड टोळीच्या वापराबाबत चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रामध्ये राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यानंतर आता मनिषा कायंदे या शिंदे गटात गेल्याने सुषमा अंधारे यांनी हे पत्र व्हारल करून या आरोपांमुळेच आपण शिंदे गटात गेल्या आहात का? असा सवाल कायंदे यांना केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

हे पत्र ट्विट करत अंधारे यांनी कायंदे यांना त्यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणावरून सवाल करत, कायंदे यांच्य पक्ष सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे. सुषमा अंधारेंनी या ट्विट मध्ये लिहिले की, ‘मनीषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापूर्वी झालेली 40 कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना? नागपूर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं.’ यामध्ये त्यांनी हे पत्र देखील दिलं आहे.

Tags

follow us