Download App

देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप

सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगर येथे सभा झाली. त्यामध्ये जि्ल्हा मोदींच्या पाठीशी आहे असं संग्राम पाटील म्हणाले.

Image Credit: letsupp

Sangram Patil : देशभरात 4 जून रोजी महाशक्तीचा जो उस्तव साजरा होणार आहे. त्या उत्सवात आपल्याला सहभागी व्हायचे आहे असा विश्वास  व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे यांचा विजय होईल असा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगर येथे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होत. त्यामध्ये ते बोलत होते.

 

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

आपल्याला मोदींना सहकार्य करून देशभरात दाखऊन द्यायचं आहे की, अहमदनगर जिल्हा किती भक्कपणे मोदी यांच्या पाठिमागे आहे असंही संग्राम जगताप यावेळी म्हणाले. व्यासपिठावर यावेळी उमेदवार सुजय विखे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  आमदार राम शिंदे, शिवाजीरावर कर्डीले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

देशाचं नेतृत्व निवडण्याची निवडणूक

ही निवडणूक ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार अशी नसून ही निवडणूक देशाचं नेतृत्व निवडण्याची आहे. त्यामुळे आपण थोडा विचार करून मतदान करायला हवं असं आवाहनही संग्राम पाटील यांनी उपस्थितांना केलं. तसंच, आज देशाचं नेतृत्व कुणाच्या हातात म्हटलं की लोक मोदींच्या हातात असं म्हणतात असंही संग्राम जगताप यावेळी म्हणाले आहेत. आपण अहमदनगर आणि शिर्डी अशा दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

 

कुणाला मतदान करावं हे सांगण्याची गरज नाही

आज देशाच्या विकासावर आपण बोललो तर देशभरात मोदींमुळे अनेक ठिकाणी विकास झाला आहे. तसंच, मागच्या दहा वर्षांत मोदींनी विकासाचं कामं झाले असल्याचा दावाही संग्राम जगताप यांनी यावेळी केला  आहे. असा विकास केल्यामुळे आपण कुणाला मतदान करावं हे सांगण्याची गरज नाही असं म्हणत संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलं.

follow us

वेब स्टोरीज