Download App

Sanjay Raut : आम्ही जी नशा करतो, ती तुम्हाला पराभूत करण्याची नशा; तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता

  • Written By: Last Updated:

The intoxication we do is pure intoxication. You are talking about hate. : ठाकरे गटाकडून नेहमीच विविध मुद्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न केली जात. मात्र, ठाकरे गटाच्या टीकेला सत्ताधारी देखील सडेतोड उत्तर देतात. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी लवकरच सरकार कोसळण्याचा दावा केला होता. यावर काल एका कार्यक्रमात बोलतांना राज्याचे उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीसांनी (श्Devendra Fadnavis) संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. काही लोक सकाळी 9 वाजता नशा करू कुस्ती खेळतात, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला होता. दरम्यान, आता संजय राऊतांनी फडणीसांवर निशाणा साधला आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलतांना राऊत म्हणाले, आम्ही नशा करतो, पण ही नशा तुम्हाला पराभूत करण्याची नशा आहे. आम्ही जी नशा करतो, ती शुध्द नशा आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय. तुमचं द्वेषाचं, सुडाचं राजकारण आहे. ती भांग अत्यंत वाईट आहे. मला त्यावर जास्त बोलालया लावू नका, नाहीतर तुमच्या आसपास नशेबाज लोक कोण आहेत, ते मला बोलावं लागेल, असं शब्दात राऊतांनी फडणवीसांना ठणकावलं.

ते म्हणाले, तुम्हाला आमची भीती वाडते हे तुम्ही स्पष्ट सांगा. महाविकास आघाडी , उध्दव ठाकरेंच्या सभांची, संजर राऊत जे बोलतात, त्याची तुम्हाला भीती वाटते, त्या भीतीतून तुम्ही अशी वक्तव्य करता, असं राऊत म्हणाले.

भाजप आणि ठाकरे गट यांच्यात कायम खडाजंगी सुरू असते. संजय राऊत हे सामनाच्या अग्रलेखांतून, पत्रकार परिषेदतून कायम भाजप आणि शिंदेगटावर हल्लाबोल करत असतात. नुकतचा राऊतांनी एक मोठा दावा केला होता. सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 गद्दार आहेत, त्यांच सरकार पुढच्या पंधार दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचं डेथ वारंट निघालं आहे, असं वक्तव्य केलं होतं.

BRS Meeting : पक्षविस्तारासाठी केसीआर यांचा मराठवाड्याकडे मोर्चा, छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा

त्यानंतर काल अहमदनगरमध्ये बोलतांना फडणवीसांनी राऊतांवर टीका केली. राजकारणामध्ये अलीकडच्या काळात काही लोक सकाळी 9 वाजता नशा करून कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं, जे असली मातीचे पैलवान आहेत, तेच कुस्ती जिंकतात, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, फडणवीसांच्या टीकेला राऊतांनीही जोरदार प्रत्युतर दिलं. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय. तुमचं द्वेषाचं, सुडाचं राजकारण आहे. ती भांग अत्यंत वाईट आहे, असं राऊत म्हणाले. दरम्यान, आता संजय राऊतांच्या टीकेला फडणवीस काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us