Download App

Uddhav Thackeray : ‘शिवसेना मागे हटणार नाही ‘नालायक’ सरकारला खड्ड्यात’.. ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना काल भांडुप पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. काल दोन्ही गटात हायहोल्टेज ड्रामा झाल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर नामक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात दिघे हे नालायक गद्दारांनी जी इरसाल भाषा वापरतात त्याच उपाधीचा उल्लेख दळवींनी (Datta Dalvi) गद्दार हृदयसम्राटांच्या बाबतीत केला. त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच भोxxx या उपाधीचा वापर केल्याबद्दल धर्मवीर चित्रपटाचे निर्माते, दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील का, असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Uddhav Thackeray : 2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’.. ठाकरे गटाची खोचक टोलेबाजी

शिवसेना सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकावूनच ती पुढे जाईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. तुकाराम महाराजांनी हे जे सांगितले ते समाजातील नालायक किंवा भुरट्या लोकांविषयी सांगितले. पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील मिंधे सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती. कारण सत्य आणि परखड बोलणे हा आता अपराध झाला आहे. चोरांना चोर म्हणायचे नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचे नाही. त्यांना युगपुरुष, महात्मा, धर्मात्मा म्हणा, असे राज्यातील मिंधे सरकारचे फर्मान आहे.

भाजपाईंना खोके पोहोचविणाऱ्यांना काय म्हणणार ?

यातील काही जणांची स्वतःला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्य एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत अधोगतीस जात आहे. राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवनात दुःखच दुःख आले. उभी पिके चिखलात आडवी झाली. प्रचंड नुकसान झाले. शेतकरी बांधावर बसून धाय मोकलून रडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. या नालायकीस काय म्हणायचे. स्वतःचे घर असे वाऱ्यावर सोडून इतर राज्यांतील भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना नालायक नाही म्हणायचे तर काय म्हणायचे, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

Uddhav Thackeray : आता जुगार बचावो मंत्रालय तर सुरू होणार नाही ना? ठाकरे गटाचा खोचक टोला

 

follow us