Download App

‘…पुन्हा रडत आलात तर ठोकून काढणार’; आंबडेकरांचा ‘इंडिया’ आघाडीला इशारा

Sujat Ambedkar On India Alliance : तुम्हाला संधी देतोयं, पुन्हा रडत आलात तर ठोकून काढणार असल्याचं म्हणत सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना थेट धमकावलंच आहे. दरम्यान, नांदेडमधील कंधार-लोहामध्ये आयोजित मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली आहे.

‘खरगे-फरगेंना ओळखत नाही नितीश कुमारच..,’; इंडिया आघाडीत जेडीयूच्या आमदाराचा मिठाचा खडा!

सुजात आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीसोबत युती करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहिलं आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीने संविधान सन्मान सभेतून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे सोबत नसलो अन् आम्ही लढलो तर पुन्हा अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण घरी बसले. 15-20 खासदार, 25-30 आमदार पडले तर आमच्याकडे रडत यायचं नाही. तुम्हाला संधी देतोयं, पुन्हा रडत आलात तर ठोकून काढणार असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

दिल्लीच्या महान व्यक्तीची भारत जोडो यात्रा :
दिल्लीचे महान व्यक्ती निघाले भारतभर फिरायला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते भारत जोडत आहेत. भारत जोडण्यासाठी आधी जाती तोडाव्या लागतात. जातीव्यवस्था तोडायची असेल तर आंबेडकरवाद आणि बाबासाहेबांचं आचरण करावं लागतं. जात ही व्यवस्था मोडायची असेल तर एकच पर्याय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.

Oscar 2024 मधून ‘2018 : एव्हरीवन इज हिरो’ बाहेर; एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन नाही, चाहते नाराज

अभी तक मौका है साथ में आओ… बाळासाहेबांनी मल्लिकार्जून खर्गेंना, राहुल गांधींना पत्र लिहिलं. पण पृथ्वीराज चव्हाण म्हणतात आम्हाला पत्रच नाही मिळालं. जर तुम्हाला संविधान सन्मान सभेचं पत्र नाही मिळालं तर नाना पटोलेंना फोन करुन कोणी पाठवलं? असा सवालही आंबेडकरांनी केलं आहे.

आम्ही वंचितांचा लढा उभारत आहोत. इतके अनेकांनी आम्हाला दूर ठेवलं. आम्हाला सोबत नाही घेतलं तरीही अजून एक टर्म सत्तेतून बाहेर राहिलो तर आम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्या सहकारी संस्था, सोयरे, शिक्षणसंस्था, संपत्ती, नातेवाईक टिकून ठेवायचे आहेत म्हणून सत्तेत जाण्यासाठी तुम्ही उलट्या उड्या मारत असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us