Download App

‘…तर तुतारीची पिपाणी’! शिवतारेंबद्दलच्या व्हायरल पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर

Vijay Shivtare Viral Letter : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून युटर्न घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. विजय शिवतारेंना अनेक सवाल करण्यात येत असून सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून प्रश्नांचा भडीमार करणारं पत्रच व्हायरल झालं आहे. याच पत्राला शिवतारे समर्थकांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. विजय शिवतारे यांचे पुरंदरमधील समर्थक माणिक निंबाळकर यांनी हे पत्र लिहिलं आहे.

टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ

दुसरीकडे आता विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर शिवतारे यांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत असून या पत्रामध्ये कार्यकर्त्यांकडून शिवतारे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. काही दिवसांपासून विजय शिवतारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र अचानक त्यांनी माघार घेतल्याने कार्यकर्त्यांची अडचण झाली असून आता पाच लाख तीस हजार मतदारांनी काय करायचे? असं प्रश्न या व्हायरल पत्रामध्ये विचारण्यात आले आहे.

निंबाळकरांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
“तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपारीक पद्धतीचं पत्रलेखन करीत नाही. जय महाराष्ट्र हे आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं संबोधन त्याच्या कायम ओठावर असतं. निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही”.

“बापूंनी अजित पवारांशी तह केल्याचं दुःख शिवसैनिकांना अजिबात नाही. पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत किती घबराट निर्माण झाली आहे ते अशा बोगस पत्रामुळेच आम्हाला समजलं. ह्याच पुरंदरला महाराजांनी तह करून २३ किल्ले गनिमाला देऊ केले होते. पण त्यानंतर अवघ्या काही कालावधीत आपल्या मुळ किल्ल्यांसह मराठी साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून दिलं होतं. हल्ला, प्रतिहल्ला, त्याग, समर्पण, तह आणि त्यातून जनकल्याण साधणं हे पुरंदरला नवीन नाही. ज्या माणसाने पुरंदरच्या पाण्यासाठी स्वतःचं अपरिमित शारीरिक नुकसान करून घेतलं त्याला गुंजवणीच्या पाण्यापेक्षा मोठं काहीच नाही”.

नांदेडमध्ये अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये फिक्सिंग, प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

“बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न या तहातून सुटणार असतील तर असा तह करणं कधीही योग्यच. बारामतीत बसून अशी पत्र लिहिण्यापेक्षा बारामतीच्या सुपे परगण्यात, पुरंदरच्या पूर्व भागात आणि इतर दुष्काळी परिसरात फिरलास तर गुंजवणीचं महत्त्व तुला कळेल. राहिला प्रश्न विश्वासार्हतेचा. महाविकास आघाडी हाच मुळात पलटूराम लोकांचा मेळावा आहे. ज्यांची आयुष्ये स्वार्थासाठी पलट्या आणि कोलांटउड्या मारण्यात गेली त्यांनी विजय शिवतारे यांना विश्वासार्हता शिकवावी हाच मोठा विनोद आहे. खोके वगैरेची आवश्यकता शिवतारे यांना मुळीच नाही. त्यांच्या पुढच्या पिढीलाही नाही. इथला प्रत्येक नागरीक हे जाणतो”.

“बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव. शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे”.

follow us