Download App

कैद्यांना काजूकतली मिळते? राजू शेट्टींच्या ‘त्या’ आरोपांवर तुरुंगवास भोगलेले माजी आयपीएस अधिकारी म्हणतात…

Ex IPS Ravindranath Patil त्यांच्या 'तुरूंगरंग' पुस्तकाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत.

Ex IPS Ravindranath Patil on Raju Shetti Alleges That In Diwali Faral Jail Ig Jalindar Supekar And Amitabh Gupta Tender Corruption : रविंद्रनाथ पाटील हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी आयपीएस झाले होते. मुळचे मराठवड्यातील असलेले पण पुण्यात स्थायिक झालेले पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघड केले. मात्र त्यांना 2018 च्या बिटकॉईन फसवणुक प्रकरणात तुरूंगात जावं लागलं. त्यांच्या याच जेलमधील अनुभवांवर त्यांनी ‘तुरूंगरंग’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या याच पुस्तकाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने त्यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी IPS जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर पाटील यांना विचारण्यात आले.

विहीरीत साखर अन् लिंबू टाकून सरबत जमेल का? आमचं प्रेमाचंच राजकारण; मोहिते पाटलांनी दोन मुद्दे खोडलेच

त्यावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, जेलमध्ये कैद्यांना स्वत: च्या खर्चाने महिन्याला 6 हजार रूपये खर्च करून कॅन्टीनमधून वस्तू घेण्याची मर्यादा आहे.हे पैसे त्यांना त्यांच्या कुटुंब किंवा मित्रांकडून मनि ऑर्डरद्वारे येतात. ते कॅन्टीनमध्ये जमा केले जातात. त्यातून कैदी पदार्थ आणि वस्तू घेतात. त्यात सणावारांना गोड पदार्थ येतात. मात्र त्या बाहेरील तुलनेत प्रचंड महाग असतात.

Video : खासदार म्हणून एक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी काय केल; मोहिते पाटलांनी यादीच वाचली

तसेच जेलच्या कॅन्टीनमध्ये येणारे पदार्थ आणि वस्तू यांच्या टेंडरच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांना यावेळी पाटील यांना दुजोरा दिला. ते म्हणाले, ज्या प्रमाणे IPS जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता जेल प्रशासन आंदन दिल्यासारखं होतं. त्यांचा मनमानी कारभार तेथे चालत होता. त्यांच्या मना प्रमाणे पदार्थ आणि वस्तू यांच्या टेंडरच्या किंमती ठरवल्या जायच्या. एका वर्षात वस्तूंच्या किंमती चौपट वाढवल्या जायच्या. त्यामुळे कैद्यांना हे पदार्थ घेणं शक्यच नसत. त्यामुळे अंजली दमानिया आणि राजू शेट्टी यांनी केलेले आरोप खोटे नाहीच. असं म्हणत रविंद्रनाथ पाटील यांनी जेलच्या कॅन्टीनमध्ये येणारे पदार्थ आणि वस्तू यांच्या टेंडरच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांना यावेळी पाटील यांना दुजोरा दिला.

विहीरीत साखर अन् लिंबू टाकून सरबत जमेल का? आमचं प्रेमाचंच राजकारण; मोहिते पाटलांनी दोन मुद्दे खोडलेच

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर रडारवर आलेले जालिंदर सुपेकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत होते. सुरूवातीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुपेकरांचे कारनामे समोर आणले. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी IPS जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी मिळून बाराशे रुपयांची काजू कतली दिवाळी फराळच्या नावाखाली कैद्यांना खायला घातली. मात्र, ती काही त्यांनी खाल्लीच नाही. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती. असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.

पोलिसांनी पैसे घेतले, शाहरूखच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप अन् निलंबनाची मागणी

राजू शेट्टी यांची पोस्ट काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केला आहे. दीवाळीचा फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही, असे म्हटले आहे.

Air India Plane Crash : 31 मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले, विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली

फराळाचे दर हल्दीराम अन् चितळेंच्या दराप्रमाणे पण…

कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती.

खरेदीसाठी कोणतीही निविदा नाही

गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास ५ कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल असे म्हणत शेट्टी यांनी कैद्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या दीवाळी फराळाचे दरपत्रक पोस्ट केले आहे.

follow us