Download App

‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील 8 हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

Puneet Balan Group Provides 8,000 Kits To Policemen in Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस (Police) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून (Puneet Balan Group) जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार पुरुष तर 2 हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे. परिणामी त्यांना चांगली सेवा देता येणार आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. यावर्षी येत्या 6 जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणार्या महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींसाठी सहा हजार पुरुष कर्मचारी आणि दोन हजार महिला कर्मचारी असे जवळपास आठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत.

अमेरिकेने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाइट हॅमर; जेट्स भारतातून गेली का? सत्य काय?

आषाढी वारी सोहळ्याच्या आठ दिवस हे सर्व अधिकारी कर्मचारी पंढरपुरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट बॅगेसह उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पंढरपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. पंढरपूरचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यांच्याकडे हे कीट सुपूर्त करण्यात आले. गतवर्षीही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून हे किट देण्यात आले होते.

‘केम छो वरळी… म्हणून कोणाचे पाय चाटले नाही’; मनसे नेत्याची संजय राऊतांवर जहरी टिका

किटमधील वस्तू
कोलगेट पाऊच, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.

उन, वारा, पाऊस यांची तमा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं काम हे पोलीस बांधव करत असतात. त्यामुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याचं समाधान असल्याचं युवा उद्योजक पुनीत बालन यांनी म्हटलं आहे.

follow us