Download App

लडेंगे और जितेंगे! राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी दिले नवे संकेत

Supriya Sule On Sharad Pawar NCP 26th anniversary : यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात स्पष्ट केलंय. ‘लडेंगे और जितेंगे’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात (NCP 26th anniversary) येत असतो, आपल्याही आयुष्यात आलं, म्हणून हतबल व्हायची गरज नाही, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलंय. यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, जयंत पाटील यांनी पत्र दिलं नाही, राजीनामा दिला नाही.प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, तर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रश्न येतोच कुठं? याबाबत पक्षात सविस्तर चर्चा होईल. जयंत पाटील यांनी केवळ त्यांचा विचार मांडला. अजित पवार आणि मी कुटुंब म्हणून नेहमी एकत्र असणार, असं देखील खासदार सुळे यांनी स्पष्ट केलंय.

‘राजकारणाचा काही अंदाज नाही, तुम्ही आशावादी राहा’; खा. लंकेंनी नेमकं काय सांगितलं ?

दरमहिन्याला दोन महिन्याचं ओपन वर्कशॉप ठेवावं. आपली विचारधारा कळली पाहिजे, अशी देखील मागणी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केलं आहे. ट्रेनिंग प्रोग्राम पक्षाने घेतलाच पाहिजे. शून्यातून पक्ष उभे राहतात, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याची परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे. त्यामुळे मी स्वत: राज्याचा दौरा करणार आहे.

सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा

मंत्र्यापेक्षा आमच्या खासदारांचे भाषण लोकसभेत भारी असतात. देशात मोठा निर्णय घेतला जातो तेव्हा राष्ट्रवादीचं मत घेतलं जातं, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर राजकारणात काम करताना पॉलिसी लेव्हलला काम केलं पाहिजे. राजा जर विमानाने चालत असेल, तर त्याला प्रजाचं काय चाललंय ते कसं समजणार? असा देखील सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय.

देशाचं नेतृत्व करण्याची संधी

ऑपरेशन सिंदूरच्या कामासाठी मी गेले, मला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हे माझ भाग्य. ज्या ज्या देशात मी गेले तेथे पहिला प्रश्न विचारायचे महात्मा गांधींबद्दल विचारायचे. नंतर नेहरू, इंदिरा यांच्याबद्दल विचारायचे. परदेशात मोदींबद्दल पण चांगलेच बोलत असायचे, गैरसमज नसावा, असं देखील त्यांनी म्हटलंय.

 

follow us