सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा

सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा

Aniket Tatkare On Ajit Pawar NCP 26th anniversary : पुण्यात अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापनदिन पार पडत आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली, (NCP 26th anniversary) प्रफुल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची घोडदौड अजून वेगाने होवो, अशा भावना वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनिकेत तटकरे यांनी (Aniket Tatkare) बोलून दाखवल्या आहेत.

यावेळी त्यांनी इतर कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिलेल्या ध्येयधोरणाला धरून सगळ्या मंडळींनी काम करावं. पक्ष, त्याची संघटना अधिक तळागाळात पोहोचून त्या भागातील लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील? अजितदादा दिवसाच्या 24 तासातील जवळपास 18-18 तास काम करतात. तशीच प्रेरणा घेवून कार्यकर्त्यांनी काम केल्यास निश्चितपणे पक्षाला सुगीचे दिवस येतील, असं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

सरकारी विभागात भ्रष्टाचाराची कीड! सांगली मनपाचा उपायुक्त जाळ्यात; 7 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या

दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं?

पवार कुटुंबाने एकत्र यावं किंवा नाही यावं, हा त्यांचा कौंटूबिक भाग आहे. कुटुंब एकत्र आल्यास निश्चितपणे आनंद असतो. परंतु पक्ष म्हणून विचार केल्यास, मागील तीन-साडेतीन वर्षापासून आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली चांगली वाटचाल केलेली आहे. त्याच भूमिकेला अनुसरून पुढच्या काळात आम्ही चालू. एकत्रीकरणाच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ नेत्यांनी विचार मांडले आहेत. परंतु सध्या तरी काही दिसत नाही, असं देखील तटकरे यांनी म्हटलेलं आहे.

Video : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा; दमदार भाषण केल्यानंतर जयंतरावांचे राजीनाम्याचे संकेत

आपली बाजू कितीही खरी असली असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलं होतं. यावर अनिकेत तटकरे यांनी म्हटलं की, ताईंनी काय स्टेटस ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्या प्रदीर्घकाळ नेत्या आहेत. मी त्यावर मत व्यक्त करणं उचित ठरणार नाही, असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

हाके कधीपासून ओबीसी समाजाचे नेते झाले?

लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अनिकेत तटकरे यांनी म्हटलं की, हाके कधीपासून ओबीसी समाजाचे नेते झाले? जो व्यक्ती ग्रामपंचायत सारखी एक साधी निवडणूक सुद्धा लढवून आलेला नाही, त्याने अजितदादांवर टीका टिप्पणी करणं, हे निषेधार्ह आहे. ते वैयक्तिक स्वार्थापोटी असं करीत आहेत अशी टीका तटकरे यांनी लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. अजितदादांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत 40 वर्षांहून अधिक योगदान आहे, असं देखील अनिकेत तटकरे यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube