Download App

इंग्लंडची विजयी सलामी; भारतावर 5 विकेट्सने मात, शुबमनने फलंदाजांवर फोडल पराभवाचं खापर

भारतीय क्रिकेट संघाला लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने संताप व्यक्त केला.

  • Written By: Last Updated:

ENG vs IND : टीम इंडिया विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड क्रिकेट टीमने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने लीड्समध्ये पहिल्या सामन्यातील पाचव्या आणि अंतिम दिवशी भारतावर 5 विकेट्सने विजय मिळवला. (IND) टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 82 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 373 धावा केल्या. इंग्लंडने यासह 1-0 अशी आघाडी घेतली.

बेन डकेट हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डकेटने शतकी खेळी केली. तर इतर फलंदाजांनी चांगली साथ देत इंग्लंडच्या विजयात योगदान दिलं. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. त्यानंतर बेन डकेट आणि झॅक क्रॉली या जोडीने पाचव्या दिवशी अप्रतिम सुरुवात केली आणि इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. डकेट आणि क्रॉली जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

या दोघांनी 188 धावांची सलामी भागीदारी केली आणि टीम इंडियाला बॅकफुटवर फेकलं. इंग्लंडने झॅक क्रॉलीच्या रुपात पहिली विकेट गमावली. क्रॉलीने 65 रन्स केल्या. त्यानंतर ओली पोप स्वस्तात आऊट झाला. पोपने 8 रन्स केल्या. शार्दूल ठाकुर याने बेन डकेट आणि हॅरी ब्रूक या दोघांना सलग 2 चेंडूवर बाद केलं. डकेटने सर्वाधिक 149 धावा केल्या. तर हॅरी ब्रूक पहिल्याच बॉलवर आऊट झाला. शार्दुलने घेतलेल्या सलग 2 विकेट्समुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या. मात्र इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली.

ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयी मिरवणूक काढता येणार क? BCCI चे नवे 8 नियम काय?

टीम इंडियाने पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक केलं. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 500 धावाही करता आल्या नाहीत. भारताचा पहिला 471 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरात 465 रन्स केल्या. त्यामुळे भारताला नाममात्र 6 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून त्यानंतर केएल राहुल याने शतक केलं. तर ऋषभने पुन्हा शतक केलं. ऋषभने यासह एकाच सामन्यात दुसरं शतक केलं. टीम इंडियाने यासह एकाच सामन्यात 5 शतकं पूर्ण केली.

एक शानदार सामना राहिला.आमच्याकडे संधी होती. आम्ही कॅचेस सोडल्या, खालील क्रमातील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. मात्र, मला माझ्या संघावर गर्व आहे. एकूणच चांगला प्रयत्न केला. आम्ही 430 च्या आसपास धावा करुन डाव घोषित करु असं, आम्ही काल विचार करत होतो. मात्र, दुर्देवाने आम्ही तसं करु शकलो नाहीत. त्यामुळे कायम त्रास होतो. यावेळेस आम्ही धावा करु शकलो नाहीत. आगामी सामन्यांमध्ये आम्ही यात सुधारणा करु, असा विश्वास शुबमनने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान व्यक्त केला.

follow us